May 31, 2025
Dr. Anant Ingle guiding farmers on soybean fertilizer and nutrient management in a farm training session.
Home » सोयाबीन : खत व अन्नद्रव्ये व्यवस्थापन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सोयाबीन : खत व अन्नद्रव्ये व्यवस्थापन

✍🏻 सोयाबीन पिकाचे वाढलेले क्षेत्र आणि दरवर्षी घेतले जाणारे एकच पीक यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर त्याचा परिणाम होतो आहे, कमी झालेले पशुधन त्यामुळे शेणखत व कंपोस्ट खत यांची उपलब्धता सहजासहजी होत नाही किंवा ते सामान्य शेतकरी वर्गाला परवडणारे नाही. दिवसेंदिवस जमिनितल सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे, आपण त्याकडे लक्ष देत नाही, परंतु आपण सोप्या गोष्टी करत असतो, त्यामुळे उत्पादन वाढ होण्यासाठी आपल्याला जास्तीचा खर्च करावा लागतो.

✍🏻 डॉ. अनंत इंगळे,
संचालक, विदर्भ कृषी विकास प्रतिष्ठान, चिखली, बुलडाणा

👉🏻 पिकाचे उत्पादन हे आपल्या जमिनीची पोत व आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करतो यावर अवलंबून आहे, पिकाला योग्य मात्रेत खते दिल्यास त्याची वाढ योग्य होते व उत्पादन वाढीबरोबर गुणवत्तापूर्ण उत्पादन आपल्याला मिळते त्यामुळे खत व्यवस्थापन हे खूप महत्वाचे असते.

👉🏻 खत व्यवस्थापन करण्यासाठी साधारणतः रासायनिक व शेणखत यांचा वापर केला जातो, यांचा वापर जर माती परीक्षण करून केला तर आपल्याला खत व्यवस्थापन करणे सुकर होते व अधिकचा खर्च आपण वाचवू शकतो.

➢ एकात्मिक खत व अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आजच्या काळाची गरज आहे, त्या दृष्टीने शेणखत किंवा कंपोस्ट
खत हेक्टरी ४-५ टन द्यावे, तसेच गांडूळ खताचा वापर करावा.

👉🏻माती परीक्षण व शिफारशी नुसार खत व्यवस्थापन करावे. सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन करताना शेतकरी अंदाजे खत देतात एकरी एक बॅग किंवा दीड बॅग असे अंदाजे खत देणे टाळावे, योग्य सल्ला घेऊन व योग्य प्रमाणत खत व्यवस्थापन करावे.

👉🏻 बाजारात उपब्धतेनुसार शेतकरी DAP, १०:२६:२६, २०:२०:०:१३, १५:१५:१५ किंवा ९:२४:२४ किंवा २४:२४:०० किंवा १२:३२’१६ किंवा १४:३५:१४ असे खते वापरतात परंतु यातून आपल्या सोयाबीन पिकाला जे पाहिजेत ते मिळते का हे शोधणे आवश्यक आहे.

👉🏻 विद्याीठाच्या शिफाशींनुसार सोयाबीन पिकाला ३०:६०:३०: २० किंवा ४०:८०:४०:२० किलो NPKS ( नत्र, स्फुरद, पालाश आणि सल्फर) प्रति हेक्टर देणे आवश्यक आहे, जर माती परीक्षण केले नसेल तर याप्रमाणे देणे आवश्यक आहे, माती परीक्षण केले असेल तर त्यानुसार मात्रा बदलते. ही मात्रा देण्यासाठी आपल्याला एकरी ६५-७० किलो डी.ए.पी. सोबत १० किलो युरिया देणे आवश्यक आहे आणि २०-२५ किलो पालाश जर आवश्यकता असेल तरच कारण आपल्या महाराष्ट्रतील सर्वच जमिनीमध्ये पालाश मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, आणि त्यासोबत गंधक ६-८ किलो एकरी याप्रमाणे देणे आवश्यक आहे.

👉🏻 आपलयाला जर SSP ( सिंगल सुपर फॉस्फेट) चा वापर करायचा असेल तर एकरी २ बॅग SSP पेरणी पूर्वी किंवा पेरणीच्या वेळी, त्यानंतर पेरणी करत असताना ३५ -४० किलो DAP किंवा ५० -६० किलो १०:२६:२६ आणि २० किलो युरिया याप्रमाणे द्यावे.
( झिंक कोटेड SSP वापरले तर गंधक व झिंक वेगळे देण्याची गरज नाही )

👉🏻 वरील प्रमाणे पेरणी करताना जर पूर्ण मात्रा देणे शक्य झाले नाही, तर पेरणी नंतर १५-२५ दिवसांनी २० किलो डीएपी आणि ५ किलो झिंक सल्फेट देऊ शकता.

👉🏻जर आपल्याला २०:२०:०:१३ हे खत वापरायचे असेल किंवा तेच उपलब्ध असेल तर मात्रा एकरी २ बॅग SSP पेरणीपूर्वी देऊन पेरणी करताना ७०-७५ किलो २०:२०:०:१३ द्यावे किंवा ५० किलो पेरणीच्या वेळी व १५-२५ दिवसांनी २५ -३० किलो द्यावे, यामध्ये जर पालाश ची कमतरता दिसून आली तरच पालाश द्यावे. ही खत मात्रा देत असताना यासोबत २ किलो Fertera ( Chlorantraniprole 0.4% GR) किंवा 4- 5 किलो Thiamethoxam 0.9%+ Fipronil 0.2% GR यांचा वापर करावा, यांचा वापर पेरणीच्यावेळीच करायचा आहे.

➢ मराठवाडा व विदर्भातील या जमीनींमध्ये गंधक, लोह, जस्त या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून येते. त्यासाठी गंधक (२० किलो प्रति हेक्टरी), झिंक सल्फेट (१०-१२ किलो प्रति हेक्टरी), फेरस सल्फेट (१० ते १२ किलो प्रती हेक्टरी) आणि बोरॅक्स (५ किलो प्रति हेक्टरी) लागवड करताना जमीनीतून द्यावे.

➢ सोयाबीन हे तेलबिया वर्गातील पीक असल्यामुळे गंधकाची मात्रा देणे आवश्यक आहे व ते फायदेशीर ठरते.
➢ सुरवातीला मोठ्या प्रमाणावर सोयबीन पिवळे झालेले दिसून येते त्यासाठी झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट चा वापर करावा पाऊस जास्त झाला असेल तर अमोनीयम सल्फेट चा वापर करावा.

👉🏻 अन्नद्रव्ये व्यवस्थापन करताना पाण्यात विरघळणाऱ्या खतांची कार्यक्षमता चांगली असल्याने त्यांचा सुध्दा आपण वापर करू शकतो
पहिली फवारणी १५-२० दिवस १९:१९:१९ १०० gm प्रती पंप
दुसरी फवारणी ३५-४० दिवसांनी १२:६१:०० १०० gm प्रती पंप
तिसरी – ५५-६५ दिवसांनी ०:५२:३४ १०० gm प्रती पंप आणि शेवटी ७०-७५ दिवसांनी ०:०:५० ८० gm प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी,

👉🏻यामध्ये सुरवातीच्या काळात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आपण करू शकतो २५ -३० मिली किंवा ग्राम प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी.
वरील प्रमाणे खत व अन्नद्रव्ये व्यवस्थापन आपण सोयाबीन पिकाचे केले तर नक्कीच चांगले उत्पादन आपल्याला मिळेल. वरील खत व्यवस्थापन करताना आपल्याला रासायनिक खताचा एकरी २०००-३०००/- खर्च येऊ शकतो, जमिनीची पोत बघून खताची मात्रा देणे आवश्यक आहे , हलकी जमीन असेल तर खत व्यवस्थापन त्या नुसार करावे, जास्त खर्च होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे, शेणखत व गांडूळ खत यांचा वापर करणे आवश्यक आहे, त्यामुळे जमिनीची पोत सुधारते व उत्पादनात वाढ होते.

@ गांडूळ खत ५० किलो आणि tricoderma ३-४ लिटर/ किलो आणि Metarizium मिसळून पिक २०-२५ दिवसांचे असताना, जमीन ओली असेल त्यावेळी सर्व शेतात फेकून द्यावे जेणेकरून, कॉलर रॉट, चारकोल रॉट, मूळकूज या रोगांचे आणि हुमणी अळीचे नियंत्रण करणे शक्य होईल..


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading