गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून गेल्या दोन वर्षात अनुक्रमे ३६ व ३३ साहित्यिकांना तसेच १९ साहित्यिकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार- २०२६” साठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य स्विकारले जाईल. तरी कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह/ गझलसंग्रह, समीक्षा किंवा संपादन, नाटक/एकांकिका, किंवा नाट्यविषयक ग्रंथ, आत्मकथन किंवा चरित्रग्रंथ, ललीत/ वैचारिक लेखसंग्रह/ प्रवासवर्णन, व बाल /कुमार साहित्य व संकिर्ण या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या २ प्रती व अल्पपरिचय, केवळ पोस्टानेच चुडाराम बल्हारपुरे (नाटककार), महामृत्युंजय निवास, वार्ड क्रं. १७, राधे बिल्डिंगच्या मागे,चामोर्शी रोड, गडचिरोली पिन- ४४२६०५ (म.रा.), भ्रमणध्वनी क्र . ९६२३६६३४३५, या पत्त्यावर ३० जून २०२६ पर्यंत पाठवावे असे आवाहन संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
