April 27, 2026
२७ सप्टेंबर ते दसऱ्यापर्यंत (२ ऑक्टोबर) महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक व मराठवाडा जिल्ह्यांसाठी इशारा.
Home » दसऱ्यापर्यंत येत्या ६ दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दसऱ्यापर्यंत येत्या ६ दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रूपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे उद्या (शनिवारी २७ ला) सकाळ पर्यन्त हवेच्या तीव्र  कमी दाबात रूपांतराची व चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासुन म्हणजे शनिवार दि. २७ सप्टेंबरपासुन दसऱ्यापर्यंतच्या ६ दिवसात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

अतिजोरदार पावसाचे जिल्हे व तारखा अशा…

शनिवार दि. २७- मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव, लातूर, नांदेड.

रविवार दि. २८- मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,नाशिक, छ. सं. नगर व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा

सोमवार व मंगळवार दि. २९ व ३० -मुंबई, पालघर, ठाणे, रायगड व नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा

उघडीपीची शक्यता- शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पासुन पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते.

नद्यांच्या खोऱ्यातील जल आवक व धरण जल -संचय –
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यात  मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे ह्या नद्यांच्या  धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

बळीराजाचं ‘बाटुक’ आयुष्य — कवितेतून उमटलेली जिव्हारी लागणारी वेदना

शेताची सीता : वैदिक शेती

मंगळवारपासून पुन्हा थंडीची शक्यता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!