March 30, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Call for poetry anthologies for 'Meghdoot' award
Home » ‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

बार्शी (जि. सोलापूर) येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी कालिदास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गेली 31 वर्ष कवी कालिदास मंडळ साहित्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने मंडळाच्यावतीने दरवर्षी नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहास मेघदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यानुसार जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहास या वर्षी जुलै मध्ये होणाऱ्या कालिदास महोत्सवामध्ये ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्राप्त झालेल्या संग्रहातून दोन संग्रहांची निवड या पुरस्कारासाठी केली जाणार आहे. हे मेघदूत पुरस्कार साहित्यिक पं. ना. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कवी मुकुंदराज कुलकर्णी यांच्यावतीने व ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून कवींनी दिनांक २० जून २०२४ पर्यंत काव्यसंग्रहाच्या तीन प्रती पाठवाव्यात, असे आवाहन कालिदास मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांच्यासाठी 8485040023 या मोबाईलवर संपर्क करावा.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
प्रकाश गव्हाणे, ईश्वरी अभ्यासिका, पाटील प्लॉट, शिवाजी नगर, बार्शी ता. बार्शी जिल्हा सोलापूर पिन ४१३४११ (मो. ९७६३४६६८३०)

Related posts

नाशिक जिल्ह्यातील साठएक गडांचा जागर

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्यात संशोधकांना यश

अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!