आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ ?
माणिकराव खुळे, मोबाईल – 9423217495
मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात रविवार (दि.३० जून) पर्यन्त वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम जरी असली तरी आता खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगांव अश्या तीन जिल्ह्यात तसेच उत्तर नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा ह्या तालुक्यात मात्र आजपासुन आठवडाभर म्हणजे गुरुवार (दि. ४ जुलै) पर्यन्त, गुजरात राज्याच्या पश्चिमेंकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगी पावसाची जोरदार शक्यता मात्र वाढली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित नाशिक, सिन्नर, नांदगाव, निफाड, येवला ह्या ५ तालुक्यात तसेच नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या ६ जिल्ह्यात रविवार दि. ३० जून पर्यन्त मात्र वर्तवलेली मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच आहे.
मुंबईसह कोकण व विदर्भात रविवार (दि. ३० जून)पर्यंत वर्तवलेली जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.फक्त दरम्यानच्या पाच दिवसात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यापैकी काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ही तशीच आहे.
माणिकराव खुळे
