📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 11, 2026
काय चाललयं अवतीभवती

उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार

Dangi rain will increase in North Maharashtra

मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात रविवार (दि.३० जून) पर्यन्त वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम जरी असली तरी आता खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगांव अश्या तीन जिल्ह्यात तसेच उत्तर नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा ह्या तालुक्यात मात्र आजपासुन आठवडाभर म्हणजे गुरुवार (दि. ४ जुलै) पर्यन्त, गुजरात राज्याच्या पश्चिमेंकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगी पावसाची जोरदार शक्यता मात्र वाढली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित नाशिक, सिन्नर, नांदगाव, निफाड, येवला ह्या ५ तालुक्यात  तसेच नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या ६ जिल्ह्यात रविवार दि. ३० जून पर्यन्त मात्र वर्तवलेली मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच आहे.

मुंबईसह कोकण व विदर्भात रविवार (दि. ३० जून)पर्यंत वर्तवलेली जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.फक्त दरम्यानच्या पाच दिवसात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यापैकी काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ही तशीच आहे.

माणिकराव खुळे

Related posts

कवी सफरअली इसफ यांना भूमी काव्य पुरस्कार जाहीर

अमरवेल पुस्तकास शब्दांगण पुरस्कार

कल्पक शेतकऱ्याचा पद्मश्री 2022 ने सन्मान

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406