‘ मुंबईत उष्णता तर उर्वरित महाराष्ट्रात आल्हाददायक ‘
मुंबईसह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यंत उष्णतेची लाट तर नव्हे पण उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती व दमटयुक्त उष्णता ह्या ५ जिल्ह्यात जाणवेल, असा हवामानाचा अंदाज आहे.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
सध्या कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार (दि.१८ मे) पर्यन्त वादळी वाऱ्यासह विजा व पावसाचे वातावरण तर कोकणातील ७ जिल्ह्यात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यंत ढगाळ वातावरणसहित किरकोळ पावसाची असणारी शक्यता आहे.
मुंबईसह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यंत उष्णतेची लाट तर नव्हे पण उष्णतेच्या लाटसदृश्य स्थिती व दमटयुक्त उष्णता ह्या ५ जिल्ह्यात जाणवेल, असा हवामानाचा अंदाज आहे.
ह्याउलट मराठवाडा व विदर्भातील १९ जिल्ह्यात व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, दिंडोरी, नांदगाव, येवला व लगतच्या तालुक्यात मात्र अवकाळी सावट जरी असले तरी पहाटेचे किमान व दुपारचे कमाल अशी दोन्हीही तापमाने आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे )पर्यंत सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने खालावून उष्णतेच्या काहिली विशेष जाणवणार नाही, असे वाटते. कोकण व मध्य महाराष्ट्रातील उर्वरित ११ जिल्ह्यात मात्र दोन्हीही तापमाने सरासरी इतकीच असतील.
मान्सून शनिवार ( दि.१९ मे )दरम्यान बंगालच्या उपसागरात, इंडो्नेशियाच्या पश्चिम किनारपट्टी व सुमात्रा बेटापर्यन्त पोहोचण्याची शक्यता कायम जाणवते. त्यानुसार देशाची पूर्व किनारपट्टी, कन्याकुमारी, व आग्नेय अरबी समुद्रात पूर्वमोसमी गडगडाटी पाऊसपूरक वातावरण तयार होत आहे, असे जाणवते.
माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
