कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे. याचे उद्घाटक म्हणून राजस्थानचे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक गोपाळ सहर यांची निवड करण्यात आलेली आहे.
शब्दों का सौदागर, भोर उगे सांझ ढले (कहानी), तिनका-तिनका सपने (डायरी), अंधेरे में चुपके से चाँद (डायरी), कुछ यूं बुनते हुये (डायरी), हवा में ठहरा सवाल (कहानी), लोहा हैं ये शब्द (डायरी), संस्कृत लोककथा में लोकजीवन (शोध), अंबाशंकर नागर शब्द, कर्म और मर्म। ही गोपाळ सहर यांची प्रकाशित पुस्तके आहेत. विकल्प (हिन्दी पाक्षिक) स्पेक्ट्रेम (शोध-पत्रिका) यांचे संपादन त्यांनी केलेले आहे.
दैनिक दिव्य भास्करचे पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. ‘भोर उगे सांझ ढले’ (कहानी संग्रह), अँधेरे में चुपके से चाँद, कुछ यूँ बुनते हुए (डायरी) या पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद तसेच काही कथा डायरी यांचे गुजराती व ओडिया भाषेत त्यांनी अनुवाद केला आहे.
राजस्थान साहित्य अकादमी द्वारा चंद्रदेव शर्मा (द्वितीय) पुरस्कार, गुजरात साहित्य संगम द्वारा ‘रांगेय राघव पुरस्कार, ‘सम्बोधन’ द्वारा कथा शिरोमणि सम्मान, आचार्य निरंजननाथ सम्मान’ (2018) त्यांना मिळालेले आहेत. खुला लिफाफा हे त्यांचे पुस्तक विशेष गाजलेले आहे. सध्या ते गुजरात येथे कपडवंज या ठिकाणी प्राचार्य म्हणून सेवेत कार्यरत आहेत.
पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने भारत को क्रेडीट सोसायटी हॉल गांधी मैदान, मेन गेट जवळ, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे ११ मे २०२५रोजी ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात सहर यांच्या हस्ते पसायदान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.