अनाथांची माय…
वर्धा जिल्ह्यातील नवरगावी
सिंधूताईंचा जन्म झाला
गुरे वळण्याचा वडिलांचा
बालपणी व्यवसाय त्यांनी केला..१
मुलगा घराचा वारस
सर्वांना हवा असे
मुलींचा जन्म होणे
आईबापाला ताप भासे..२
मुलगी असे नकोशी
म्हणून चिंधी नाव ठेवले
गुरे वळायला जाताना सांगून
शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले..३
वयाच्या नवव्या वर्षी
वयस्क पतीशी लग्न झाले
काबाडकष्ट मात्र तिच्या
नशिबास नाही चुकले..४
लहान वयातच तिच्यावर
मातृत्वाचे ओझे पडले
सगळ्यांनी निराधार केले
स्मशानभूमीत राहून पोट भरले..५
वनवासी झाली माय
नाही मानली हार
अनाथांची बनली आई
दिला निराधार मुलांना आधार..६
मिळाले अनेक उच्च पुरस्कार
पद्मश्रीने तिला गौरविले
प्रत्येक अनाथाची आई झाली
ह्रदयात सर्वांच्या अढळ स्थान राहिले..७
कवी ः सौ अनघा सावर्डेकर पाटील
मुंबई
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
