April 4, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Call for submission of books for State Level Literary Award
Home » राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती गारगोटी येथील लेखक बा. स. जठार यांनी दिली आहे.

देण्यात येणारे पुरस्कार असे –

राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार –
सदाशिव धों. जठार यांचे स्मरणार्थ कादंबरीसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे तर आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे. या व्यतिरिक्त कादंबरीसाठी दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार
यशवंत आ. इंदुलकर यांचे स्मरणार्थ उत्कृष्ठ कथासंग्रहासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे तर सरस्वती य. इंदुलकर यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे. या व्यतिरिक्त कथासंग्रहासाठी दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार –
दत्तात्रय स. जठार यांचे स्मरणार्थ उत्कृष्ठ बालसाहित्यासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तर तातोबा द. पोवार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तसेच आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरुप ₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे आहे.

लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी लेखक बा. स. जठार यांच्याशी ( 9850393996, 9420436256 ) संपर्क साधावा.

पुस्तके पाठवणेचा पत्ता – सौ. रंजना बा. जठार, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर – 416209

Related posts

पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जूनपासून बंधनकारक

अतिरिक्त तारणमुक्त कृषी कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ

अर्बन नक्षल असल्याच्या आरोपावर मेधा पाटकर म्हणाल्या…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!