May 6, 2026
Cloudy weather forecast map of Maharashtra with temperature and rainfall outlook for February 2026
Home » तीन दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तीन दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची शक्यता !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

१- ढगाळ वातावरण-

                उद्या सोमवार दि. २ ते बुधवार दि. ४ फेब्रुवारी पर्यंतच्या ३ दिवसात महाराष्ट्रातील संगमनेर, अकोला, कोपरगांव, राहता, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर आदी तालुके व नंदुरबार व जळगांव जिल्हे व लगतच्या परिसरात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर २ ते ४ मिमी. इतक्या अगदी किरकोळ हलक्या पावसाची शक्यता जाणवते. गुरुवार दि. ५ फेब्रुवारी पासुन मात्र लगेचच ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता जाणवते.

२- फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातील तापमान-

शनिवार दि. ७ फेब्रुवारी पर्यन्तच्या आठवड्यात महाराष्ट्रात पहाटे ५ च्या किमान तापमानाचा पारा फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यातील त्याच्या ह्या काळातील सरासरी तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने अधिक राहून थंडी ऐवजी उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्र तील १३ जिल्ह्यात थंडी ऐवजी रात्रीचा उकाडा जाणवेल.  उर्वरित महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यात मात्र पहाटे ५ च्या किमान तापमानाचा पारा सरासरी इतका राहून संमिश्र वातावरणाच्या अनुभवातून केवळ माफक थंडीची शक्यता जाणवते.

३-उर्वरित फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्रातील थंडी-

फेब्रुवारी महिन्यातील उर्वरित ३ आठवड्यात महाराष्ट्रात थंडी जाणवेल, परंतु मुंबईसह संपूर्ण कोकण खान्देश व मध्य महाराष्ट्र व छ. सं. नगर व जालना अश्या १९ जिल्ह्यात मात्र थंडीचे प्रमाण मात्र कमी असेल.

४- फेब्रुवारी महिन्यातील महाराष्ट्रातील दिवसाचे  कमाल तापमान –

                     नाशिक व अहिल्यानगर असे दोन जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत दुपारी ३ चे दिवसाचे कमाल तापमान सुद्धा दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जाणवणाऱ्या कमाल तापमानापेक्षा, ह्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दुपारचे कमाल तापमान अधिक असेल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात दुपारीही उन्हाचा चटका जाणवेल. त्यामुळे रब्बीच्या बागायती शेत पिकांनाही ह्या महिन्यात अधिक सिंचनाच्या आवर्तनाची गरज भासण्याची शक्यता जाणवेल.

५–उर्वरित फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय?
       
संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात भागानुसार पावसाचे प्रमाण सहसा शून्य ते १० मिमी.असते. चालु २०२६ च्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा असे ६ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यात पावसाची शक्यता ही सरासरी पेक्षा म्हणजे १० मिमी पेक्षा कमी असेल. म्हणजेच  संपूर्ण महिना  जवळपास  पावसाविना कोरडा जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत मात्र सरासरी इतक्या म्हणजे शून्य ते १० मिमी किंवा त्या पेक्षा कमी इतक्या किरकोळ पेंडकळवनी पावसाची शक्यता जाणवते. रब्बी पिकांच्या बाबतीत ही एक जमेची बाजू समजावी.

६-👆 असे वातावरण कश्यामुळे झाले?👇

नेहमी जम्मू काश्मिर, लेह लडाख ह्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जाणारे पश्चिमी प्रकशोभ सध्या ह्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिक दक्षिणेकडे म्हणजे पंजाब राजस्थान राज्यांच्या अक्षवृत्तांवरून पश्चिमेंकडून पूर्वेकडे जातांना, वाहणारे थंड व कोरडे वारे खान्देश सह  सध्या उत्तर महाराष्ट्रापर्यन्त पोहोचले आहे. शिवाय ह्या बरोबरच सध्या महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वारे स्थित असल्यामुळे, बंगाल उपसागरातील वाहून येत असलेली आर्द्रता ह्या थंड वाऱ्यात मिसळत आहे. म्हणून खान्देश सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर ढगाचे सावट आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

किटकांच्या दुनियेत – काजवा

निसर्ग !…

कृषी पर्यटनात पर्यटकांना असे करा आकर्षित…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!