March 21, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Like करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Unnati Institute stall in Danapur Marathi Boli Samhelan
Home » कोरकू बोलीसाठी उन्नती संस्थेचा उपक्रम
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कोरकू बोलीसाठी उन्नती संस्थेचा उपक्रम

  • कोरकूच्या प्रशिक्षणासाठी उन्नती संस्थेने घेतला ध्यास
  • मराठी अभ्यासक्रमाचे कोरकूमध्ये रूपांतर
  • आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी उन्नतीचे विविध उपक्रम

दानापूर ( जि. अकोला ) येथे आयोजित आठव्या मराठी बोली साहित्य संमेलनामध्ये कोरकू भाषेसाठी कार्य करणाऱ्या उन्नती संस्थेने पुस्तकांचा आणि त्यांच्या उपक्रमांची माहिती देणारा स्टॉल उभारला होता. त्यांच्या या कार्यामुळे हा स्टॉल संमेलनामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मराठी शिकण्यात येणारी अडचण असो किंवा प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कोरकू विद्यार्थ्यांना शिकवताना येणारे अडचण. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मुंबईतील उन्नती या संस्थेने कोरकू भाषेत अभ्यासक्रम रूपांतरित करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचा वसा हाती घेतला आहे. दानापूर येथील मराठी बोली साहित्य संमेलनात उन्नती संस्थेने आपल्या कार्याचा परिचय देणारा स्टॉल मांडला होता.

उन्नती संस्था ही मूळची मुंबई येथील असून पाठ्यक्रम कोरकूमध्ये रूपांतरित करून अभ्यास सोपा करण्याचे काम करीत आहे. गेल्या सात वर्षांपासून ही संस्था आदिवासी भागात काम करीत आहे. विविध गोष्टींची पुस्तके, वाचनपाठ, शैक्षणिक साहित्य, कविता या संस्थेने कोरकूमध्ये रुपांतरित केले आहेत. ही संस्था चिंचपाणी, खिरकुंड, डांगरखेड, जनुना या चार गावांमध्ये काम करीत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ही संस्था कार्यरत आहे. सुभाष केदार, रतनलाल जांबेकर, प्रकल्पाच्या सल्लागार मुंबई येथील राजश्री दामले यांनी या कार्याविषयी माहिती दिली. हेमांगी जोशी या संस्थेच्या मुख्याधिकारी आहेत

उन्नती संस्थेने कोरकू भाषा अभ्यासवर्ग ही सुरु केले आहेत. २४ दिवसांचा कोर्स यासाठी तयार केला आहे. आत्तापर्यंत शिक्षकांसह 700 जणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

Related posts

Navratri Biodiversity Theme : पिवळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…

गहू निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलरचा टप्पा

जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!