अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे वास्तव लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, तसेच निसर्गाच्या बदलत्या लहरींना तोंड देण्यासाठी शेतकरी आणि सरकारने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले आहे.
