January 25, 2026
Winners of the Pandurang Kumbhar Foundation Literary Awards 2025 announced in Kowad
Home » साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

साहित्यिक पांडूरंग कुंभार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

📚🏆📚🏆📝🏆📚🏆📚

कोवाड (ता. चंदगड) : येथील साहित्यिक कै. पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे साहित्य पुरस्कार – २०२५ जाहीर करण्यात आले आहेत. राज्यभरातून आलेल्या पुस्तकांमधून प्रतिष्ठानने ठरवलेल्या निकषांनुसार परीक्षकांनी निवड प्रक्रिया पार पाडली. ललित लेखन आणि चरित्र या दोन विभागांत प्रत्येकी तीन पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख अनंत पांडुरंग कुंभार, संजय पांडुरंग कुंभार, विनायक पांडुरंग कुंभार यांनी दिली आहे.

‘ललित लेखन’ विभागात प्रथम पुरस्कार डॉ. सुनंदा शेळके यांच्या प्रतिभेच्या पारंब्या या पुस्तकास देण्यात आला आहे. ५००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. द्वितीय पुरस्कार श्रीराम ग. पचिंद्रे यांच्या सारांश या पुस्तकास देण्यात आला आहे. २००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून तृतीय पुरस्कार सतीश तिरोडकर यांच्या अनुभवे अंतरी जैसे..या पुस्तकास देण्यात आला आहे. १००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

‘चरित्र विभाग’ विभागात प्रथम पुरस्कार केशव बा. वसेकर यांच्या वसा केशवाचा या पुस्तकास देण्यात आला आहे. ५००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. द्वितीय पुरस्कार जयवंत जाधव यांच्या वळणं आणि वळण या पुस्तकास देण्यात आला आहे. २००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून तृतीय पुरस्कार डॉ. मधुकर येवलुजे यांच्या समाज मनाची माणसं.. या पुस्तकास देण्यात आला आहे. १००१ रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कुंडल-कृष्णाई प्रतिष्ठानतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

गोरबंजारा समाजाची निसर्गपूजक विज्ञानवादी होळी

अहिल्यानगरमध्ये आयोजित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंद्रजीत भालेराव

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading