📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 28, 2026
काय चाललयं अवतीभवती

गंधगाभारामधून उलघडला कवयित्री इंदिरा संत यांचा काव्यप्रवास

Indira Sant Poetry presentation in Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवयित्री इंदिरा संत यांच्या काव्यावर आधारित ” गंधगाभारा ” हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये इंदिरा संत यांचा काव्यप्रवास उलगडला गेला.

नको नको रे पावसा घालू धिंगाणा अवेळी
घर माझे चन्द्रमौळी अन दारात सायली 

अशा एकाहून एक निसर्ग, प्रेम, विरह, ओव्या, स्त्री भावनांवर काव्यरचना करणाऱ्या तसेच आपल्या तात्कालिन कवितांचा पगडा अजुनही रसिकमनावर कायम ठेवणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत याचा काव्यप्रवास “गंध गाभारा” या विशेष कार्यक्रमातून अनुभवताना रसिक मंत्रमुग्ध झाले. 

निमित्त होते मराठी भाषा गौरव दिनाचे. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित हा कार्यक्रम  स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, प्राधिकरण, निगडी येथे झाला. व्यासपीठावर माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक  कार्यकर्त्या सरिता साने, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ  उपस्थित होते.

इंदिरा संत या प्रतिभावान कवयित्रीवर आधारित “गंधगाभारा” ची संहिताचे लेखन किरण लाखे यांचे होते. त्यामध्ये डॉ. समिता टिल्लू, इला पवार, जयश्री श्रीखंडे व प्राची कुलकर्णी यांनी आपापल्या शैलीने आशयपुर्ण भाष्य करत गद्यातून तसेच त्यांच्या विविध काव्यातून फेररफटका मारत रसिकांना खिळवून ठेवले.

कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमात कुसुमग्रज्यांच्या कणा, आगगाडी आणि जमीन, विजयोन्माद, पृथ्वीचे प्रेमगीत, पाचोळा या निवडक कविता विनीता श्रीखंडे, मंगला पाटसकर, नंदकुमार मुरडे, सुनिता बोडस, अंजली नवांगुळ यांनी त्यातील भावार्थ अर्थात रसग्रहणासहित सादर केल्या. 

राजन लाखे यांनी प्रास्तविक केले. माधुरी मंगरूळकर यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीकांत जोशी,  रजनी शेठ नंदकुमार मुरडे, दीपक अमोलिक यांनी संयोजन केले.

Related posts

प्रयोगभूमीत भात लावणी श्रमसोहळा …

मराठीमध्ये विश्वाची भाषा बनण्याचे गुण

मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ हवे .. !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406