March 30, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
On behalf of Warnanagar Branch Sahitya Parishad, an appeal to send literary works for awards
Home » वारणानगर शाखा साहित्य परिषदेच्यावतीने पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

वारणानगर शाखा साहित्य परिषदेच्यावतीने पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१ जानेवारी,२०२२ ते ३१ डिसेंबर, २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रकाशित झालेल्या विविध साहित्य प्रकारातील ग्रंथांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. कादंबरीसाठी तात्यासाहेब कोरे पुरस्कार, कवितासंग्रहासाठी सावित्रीआक्का कोरे पुरस्कार, कथा साहित्यासाठी शोभाताई कोरे पुरस्कार, विज्ञान व संकिर्ण साहित्यासाठी विलासराव कोरे पुरस्कार, बाल साहित्यासाठी मामासाहेब गुळवणी पुरस्कार दिले जाणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व वारणानगर शाखेच्या वतीने नोव्हेंबर २०२४ मध्ये वारणानगर येथे होणाऱ्या विभागीय साहित्य संमेलनामध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगरचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत संस्थेचे कार्याध्यक्ष ग्रंथमित्र के. जी. जाधव यांनी साहित्यिकांना पुस्तके पुरस्कारासाठी पाठवण्याचे आवाहन केले आहे.

तसेच कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यातील एका ज्येष्ठ साहित्यिकाला सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे साहित्यसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. साहित्यगौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या आवश्यकता नाही. रोख रक्कम, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेरील लेखकांनी मराठी भाषेत २०२२ व २०२३ या दोन वर्षांत प्रकाशित केलेल्या पुस्तकांना पहिल्या वर्षीचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

साहित्यिकांनी पुस्तकांच्या दोन प्रति फोटो व आपली माहिती ३१ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत कार्याध्यक्ष, ग्रंथमित्र- के. जी. जाधव, मुक्काम पोस्ट बहिरेवाडी, तालुका- पन्हाळा, जिल्हा- कोल्हापूर पिन कोड नंबर-४१६११३ या पत्त्यावर पाठवावीत असे आवाहन पुरस्कार संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२२१३३५६२, ९८३४३४२१२४

Related posts

या एका ओवीत दडलाय संपूर्ण अध्यात्ममार्गाचा सार

त्यांनाच म्हणती आजकाल खरे शेतकरी नेते…

जास्वंदीच्या फुलाचे सरबत..!

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!