April 11, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
krishnath-khot-new-book-in-market
Home » कृष्णात खोतांची काळ्यामाळ्या भिंगोळ्या काय आहे ?
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कृष्णात खोतांची काळ्यामाळ्या भिंगोळ्या काय आहे ?

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांची नवी कादंबरी

काळ्यामाळ्या भिंगोळ्या पुस्तक सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा https://amzn.to/3ROafbF

शिक्षणाच्या बाजारात फोफाट माजलेल्या आर्थिक, नैतिक आणि बौद्धिक भ्रष्टाचाराच्या वर्तमान वास्तवाचा त्रिमितिक एक्सरे या काळ्यामाळ्या भिंगोळ्या कादंबरीत आहे. तसेच आधुनिक मराठी साहित्याच्या देशीवादी गद्य परंपरेतील महत्त्वाचा नवा आविष्कार आहे. कादंबरीकाराच्या सामाजिक सभानतेशी एकरूप कथन- नीतिमत्ता कशी असावी याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. ग्रामीण महाराष्ट्रात समाजाच्या सर्वच स्तरावर खोल आत घुसलेली कीड, किडनी विकून जगणाऱ्या शालेय शिक्षकाच्या आणि आत्महत्यांच्या कड्याकडे ढकलल्या गेलेल्या, कोंडीत सापडलेल्याच्या नजरेतून क्षण-दर-क्षण टिपणारा ‘समक्ष’ अनुभव वृत्तांत या कादंबरीत आहे. ‘आपण दगडं फोडलेली बरी. इथं माणसाला माणूस म्हणून काहीच कसं ऐकायला येत नाही? आपल्या या व्यवस्थेनं मातीच्या गोळ्यांचं दगड तर घडवलं नाहीत?’, विचारत, व्यवस्थेचा दगड फोडून दाखवणारी ही कादंबरी आहे. भारतीय साहित्यात क्लासिक मानल्या गेलेल्या श्रीलाल शुक्लांच्या ‘राग दरबारी’च्या कसाची, दमदार राजकीय-वृत्तांत कादंबरी आहे.

गणेश देवी

पुस्तकाचे नाव – काळ्यामाळ्या भिंगोळ्या
लेखक – कृष्णात खोत
प्रकाशक – पाॅप्युलर प्रकाशन
पृष्ठे – ४६२ । मूल्य – ६९५/-

काळ्यामाळ्या भिंगोळ्या पुस्तक सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3ROafbF

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

पंढरीची वारी

साध्या पण आशयगर्भ कथा ! : आमचं मत आम्हालाच

ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!