fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 27, 2026
Home » पर्यावरणाच्या समतोलासाठी मगरींचे संवर्धन गरजेचे: डॉ. मनोज बोरकर
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पर्यावरणाच्या समतोलासाठी मगरींचे संवर्धन गरजेचे: डॉ. मनोज बोरकर

Conservation of crocodiles is necessary for the balance of the environment Dr. Manoj Borkar

पर्यावरणाच्या समतोलासाठी मगरींचे संवर्धन गरजेचे: डॉ. मनोज बोरकर

सर्वच मगरी धोकादायक नसतात, त्यांचे अस्तित्व महत्वाचे

कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मगरींचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. मनोज बोरकर (Professor and Head, Department of Zoology; Carmel College for Women, Goa) यांनी ‘Crocks on the Rocks’ या विषयावर शुक्रवारी (दि. २५) बोलताना केले.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आयोजित शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे स्मृती व्याख्यानमालेत १६ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार होत्या.

भारतात आढळणाऱ्या मगरींच्या विविध प्रजाती , त्यांचे अधिवास, त्यांची वर्तणूक, या बद्दल सविस्तर माहिती दिली. माणसावर मगरी नेहमी हल्ला करत नाहीत, माणसावर हल्ला करणाऱ्या मगरींच्या प्रजाती त्यांनी सांगीतल्या. मगरींचा अधिवास हळू हळू नष्ट होण्याची कारणे त्यांनी सांगितली. पुराणामध्ये मगरींचे खूप महत्व आहे हे सांगताना त्यांनी मगरींचे पर्यावरणातील महत्व अधोरेखित केले. तसेच मगर आणि इतर प्राण्यांचा संवर्धनासाठी आणखी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे, असे सांगितले.

व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. एस. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. विभागप्रमुख डॉ. एस. आर. यंकंची यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. एम. व्ही. वाळवेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. ए. ए. देशमुख, डॉ. एन. ए. कांबळे, डॉ. एम. पी. भिलावे, डॉ. ए. डी. गोफणे आणि प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज

SIAC मुंबईतर्फे UPSC मुलाखतीसाठी निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रम

बहुसांस्कृतिक समाजात एकजिनसीपणासाठी अनुवाद महत्त्वाचा: डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!