March 22, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Like करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
एकविसाव्या शतकातील ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि व्याप्ती या संपादित ग्रंथासाठी संशोधन निबंध मागविण्यात येत आहेत. अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५.
Home » एकविसाव्या शतकातील ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि व्याप्ती – संशोधनात्मक ग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एकविसाव्या शतकातील ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि व्याप्ती – संशोधनात्मक ग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

“ग्रामीण साहित्य हे समाजाच्या परिवर्तनाचे आरसे आहे. एकविसाव्या शतकातील बदलत्या ग्रामीण जीवनाचे शास्त्रीय दर्शन घडविणे हे या ग्रंथाचे मुख्य उद्दिष्ट आहे. संशोधक व अभ्यासकांनी आपले संशोधनपर लेख सादर करून या उपक्रमात सहभागी व्हावे.”

डॉ. मनीषा झोंबाडे

लातूर : ग्रामीण साहित्य हे भारतीय समाजजीवनाचे मूळ संस्कार वाहून नेणारे, वास्तवाचे दर्शन घडवणारे आणि बदलत्या काळाचे साक्षीदार असलेले साहित्य आहे. एकविसाव्या शतकात ग्रामीण साहित्याची वाटचाल, त्यातील विविधतेचे दर्शन आणि समस्यांचे विश्लेषण या सर्व बाबींचा अभ्यास ‘एकविसाव्या शतकातील ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि व्याप्ती’ या आगामी संशोधनात्मक ग्रंथातून होणार आहे. या ग्रंथाचे संपादन डॉ. मनीषा जगन्नाथ झोंबाडे ( मराठी विभाग प्रमुख, शिवाजी महाविद्यालय, मुरुड, लातूर) या करणार असून, संशोधक व अभ्यासकांना लेखनासाठी खुले आवाहन करण्यात आले आहे.

या संपादित ग्रंथाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त ISBN क्रमांक 978-93-344-0104-2 मिळाला आहे. त्यामुळे संशोधननिबंध सादर करणाऱ्यांना शैक्षणिक व शास्त्रीय मूल्य वाढीस लागणार आहे. ग्रंथासाठीचे लेख २००० ते २५०० शब्दांच्या मर्यादेत असावेत. निबंध मराठी किंवा हिंदी भाषेत लिहिलेले असावेत. संशोधननिबंध Times New Roman किंवा शुद्धलेखनासाठी योग्य मराठी फॉन्टमध्ये सादर करणे अपेक्षित आहे. लेखनासोबत योग्य संदर्भ देणे आवश्यक आहे.

ग्रंथाचे विषयक्षेत्र अत्यंत व्यापक आहे. ग्रामीण साहित्याचे स्वरूप व वैशिष्ट्ये, एकविसाव्या शतकातील ग्रामीण जीवनातील सामाजिक व सांस्कृतिक समस्या, बदलत्या ग्रामीण वास्तवाचे दर्शन, स्त्री साहित्यिकांचे योगदान, सांस्कृतिक परंपरा व ग्रामजीवनातील रूपांतरे, तसेच ग्रामीण काव्य, कादंबरी, कथा, नाटक आणि समकालीन प्रवृत्ती यांचा अभ्यास करण्यास संशोधकांना प्रोत्साहन दिले जात आहे. विशेषतः औद्योगिकीकरण, स्थलांतर, पर्यावरणीय प्रश्न, शहरीकरणाचे ग्रामीण जीवनावर होणारे परिणाम, ग्रामीण संस्कृतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संशोधननिबंध पाठविण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ आहे. इच्छुकांनी आपले लेख zombademj@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. लेख पाठविताना संशोधकांचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर व ई-मेल नमूद करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी ८८३००७९४३२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

या ग्रंथाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्याच्या बहुआयामी स्वरूपाचा अभ्यास करण्याची, शैक्षणिक जगतात नवे दृष्टिकोन निर्माण करण्याची आणि संशोधनाला व्यापक दिशा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण साहित्याचे मूल्य, त्यातील संघर्ष, वेदना, आनंद, संस्कृती आणि बदलते वास्तव या सर्वच अंगांचा अभ्यास या ग्रंथातून होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शोध निबंधासाठीचे मुख्य विषय असे –
१. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबरी : स्वरूप व वैशिष्ट्ये
२. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबरी : शेतकरी व शेतमजूरांच्या समस्या
३. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबरी : स्त्री समस्यांचे चित्रण
४. एकविसाव्या शतकातील वैदर्भीय ग्रामीण कादंबरी
५. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबरी : सामाज संस्कृती दर्शन
६. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबरी : राजकीय दृष्टिकोन
७. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबरी : बदलते समाज वास्तव
८. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबरी: प्रादेशिक विविधता
९. तंत्रज्ञान आणि शहरीकारणाचा परिणाम दर्शविणाऱ्या एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबऱ्या
१०. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबरी : बेरोजगार तरुण पिढीच्या समस्या
११. बदलत्या खेड्यांचा वेध घेणारी एकविसाव्या शतकातील मराठी ग्रामीण कादंबरी
१२. तंत्रज्ञान आणि शहरीकरणाचा परिणाम दर्शविणाऱ्या एकविसाव्या शतकातील ग्रामीण कादंबऱ्या
१३. आधुनिकीकरण आणि एकविसाव्या शतकातील ग्रामीण कविता
१४. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कविता : स्वरुप व वैशिष्ट्ये
१५. निसर्ग व समाज-संस्कृतीचा कलात्मक अविष्कार घडविणारी एकविसाव्या शतकातील ग्रामीण कविता
१६. स्त्रीचे भावविश्व उलघडविणाऱ्या एकविसाव्या शतकातील ग्रामीण कविता
१७. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कविता : सामाजिक समस्यांचे चित्रण
१८. निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतीवर येणाऱ्या संकटाचे चित्रण करणारी एकविसाव्या शतकातील ग्रामीण कविता
१९. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कथा : स्वरुप आणि वैशिष्ट्ये
२०. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कथा आणि ग्राम जीवनातील परिवर्तन
२१. सामाजिक समस्यांवर आधारित एकविसाव्या शतकातील ग्रामीण कथा
२२. एकविसाव्या शतकातील ग्रामीण कथांमधून घडणारे लोककलांचे दर्शन
२३. एकविसाव्या शतकातील ग्रामीण नाटक : स्वरुप व वैशिष्ट्य
२४. एकविसाव्या शतकातील ग्रामीण नाटकांमधून ग्राम व कृषी संस्कृतीचे घडविलेले दर्शन
२५. एकविसाव्या शतकातील प्रमुख ग्रामीण साहित्यिकांच्या लेखनाची स्वरुप व वैशिष्ट्ये
२६. एकविसाव्या शतकातील समग्र ग्रामीण साहित्य आणि समाज वास्तव
२७. एकविसावे शतक आणि ग्रामीण साहित्याची वाटचाल व प्रेरणा
२८. एकविसाव्या शतकातील उद्योग, व्यापार आणि ग्रामीण साहित्य
२९. एकविसाव्या शतकातील समग्र ग्रामीण साहित्य हा विषय केंद्रस्थानी ठेवून कोणत्याही एका साहित्यावर लेखन अपेक्षित आहे.
३०. एकविसाव्या शतकातील ग्रामीण साहित्य : वैचारिक लेखन

Related posts

पत्रकार

खुषखबर ! शेतकऱ्यांसाठी…

स्वःच्या अनुभुतीतूनच आध्यात्मिक विकास

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!