May 11, 2026
Satish Kalsekar award to Narayan Kulkarni Kavthekar
Home » शिवाजी विद्यापीठातर्फे काळसेकर पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

शिवाजी विद्यापीठातर्फे काळसेकर पुरस्कार जाहीर

‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी-कवठेकर (अकोला) यांना, तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ कवी वर्जेश ईश्वरलाल सोळंकी (वसई, मुंबई) यांना जाहीर

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाने यावर्षीचा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी-कवठेकर (अकोला) यांना, तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ कवी वर्जेश ईश्वरलाल सोळंकी (वसई, मुंबई) यांना जाहीर केला आहे. या पुरस्कारांची निवड कुलगुरु डॉ. डी. टी . शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने केली आहे. या निवड समितीमध्ये डॉ. रणधीर शिंदे, प्रा. प्रविण बांदेकर, डॉ. गोविंद काजरेकर यांचा समावेश आहे.

मराठीतील ज्येष्ठ कवी, लेखक आणि ग्रंथप्रेमी सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काळसेकर कुटुंबीयांनी विद्यापीठाकडे देणगी दिली. त्यातून काळसेकर यांच्या नावाने प्रतिवर्षी मराठी कवितेत आपले योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कवीस ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ आणि तरुण कवीस ऋत्विज काळसेकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यंदा पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे.

सतीश काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह आणि २१ हजार रुपये असे आहे. यंदा या पुरस्काराने ज्येष्ठ कवी नारायण कुलकर्णी-कवठेकर यांना गौरविण्यात येणार आहे. ते संपादक म्हणूनही मराठी साहित्य क्षेत्राला परिचित आहेत. त्यांचे हे माझ्या गवताच्या पात्या’, ‘मागील पानावरून सुरू’ अनुवादित कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘हस्व आणि दीर्घ’ ललितलेख संग्रह प्रकाशित आहे. मानवतावादी जाणिवा, माणसाच्या जगण्यातले विविध पातळीवरील संघर्ष, जगण्याचा अंतर्बाह्य शोध त्यांनी कवितेतून घेतला आहे.

कवी ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह आणि १० हजार रुपये असे आहे. या पुरस्काराने यंदा कवी वर्जेश सोळंकी यांना सन्मानित केले जाणार आहे. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘वर्जेश ईश्वरलाल सोळंकीच्या कविता’ सन २००२ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘ततपप’ कवितासंग्रह प्रकाशित झाला. बदलता भवताल, व्यवस्थेच्या दाबाने दबलेला माणूस आणि स्थिती त्यांच्या कवितांमधून दिसते.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

मृत्यूसमयी जिजाऊंनी शिवाजी महाराजांसाठी २५ हजार पागोडे बाजूला ठेवले होते – जयसिंगराव पवार

कडा येथील साहित्यज्योती पुरस्कार जाहीर

‘साहित्यकणा’ संस्थेला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!