May 17, 2026
गारगोटीतील अक्षरसागर साहित्य मंच पुरस्कार 2025 जाहीर कार्यक्रम
Home » अक्षरसागर साहित्य मंच गारगोटीचे साहित्य पुरस्कार – 2025 जाहीर
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर साहित्य मंच गारगोटीचे साहित्य पुरस्कार – 2025 जाहीर

कोल्हापूर – गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी जाहीर केले. यंदाच्या वर्षी भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार पिंपळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. एकनाथ पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार असे –

    कादंबरी 

1) संदीप वाकडे, निरगुडे (पुणे) – वाडा
2) राजेश चौरे, चांदा (अहिल्यानगर) – जिद्द पेरताना
3) शरद नवाळे, वाशी (मुंबई)- शेवंता

    कथासंग्रह 

1) डॉ. वर्षा फाटक, देवरुख – पाश
2) बाळासाहेब खिलारे, पुणे – पाण
3) गोपाल शिरपूरकर, – भुईकोर
4) संजय वारके, यमगे – अंतरंग शब्दांचे (उतेजनार्थ)

    कवितासंग्रह 

1) प्रतिक पवार, पनवेल- पुस्तकांना का घाबरतात माणसं…?
2) अरविंदा भामरे, धुळे – शापित कोलाहलाच्या नोंदी
3) संध्या लगड, ठाणे – पुसट सावल्या गडद काळ
( उत्तेजनार्थ )
4) डॉ. सविता शेट्टी गडहिंग्लज – सारे काही तुझ्यासाठी
5) महानंदा मोहिते, मडिलगे बु. – घुंगुरमाळा
6) बाबुराव कांबळे, गारगोटी – निढळाच्या घामाच्या कविता

     संकीर्ण

1) आसावरी इंगळे, नागपूर – चहा उकळतोय… देश सुधरेल ?
2) अरविंद गाडेकर, संगमनेर – मनातलं पानावर
3) विकास भावे, ठाणे – ओठावरली गाणी

     बालसाहित्य

1) उत्तम सदाकाळ, जुन्नर – बोळातले भूत
2) अय्युब पठाण, बिडकिन (पैठण) – अंगत पंगत
3) राजेंद्र दिघे, मालेगाव कॅंप (नाशिक) – पाखरांची गाणी

या पुरस्कारांचे वितरण 25 एप्रिल 2026 रोजी गारगोटी येथील श्री शाहू वाचनालय येथे सकाळी 10 वाजता होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी दिली आहे. यावेळी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, मंचचे सचिव बा. स. जठार, आनंद चव्हाण, तात्यासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

घाटकुळ येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे आयोजन

अनुवादातून राष्ट्रजोडणीचा संदेश देणारे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुण्यात

300 एकर जमीन क्षारपडमुक्त करण्याचा मानस

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406