भारताची सुपीक जमीन, जलसंपदा आणि नैसर्गिक पर्यावरण आज गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची चिंता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. रासायनिक खतांचा वाढता वापर, अति सिंचन, बदलते हवामान आणि जमिनीतील घटणारी सुपीकता यामुळे देशातील शेती व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. शाश्वत शेती, सेंद्रिय पद्धतींचा प्रसार आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन यासाठी तातडीने व्यापक जनजागृती व ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
प्रा. डॉ. सुमेरसिंग राजपुत,
सहयोगी प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
आपला भारत देश विविधतेने नटलेला, प्रचंड भूभाग लाभलेला आणि एकाच वेळेस वेगवेगळ्या विभागात वेगवेगळे वातावरण निर्मितीची किमया अनुभवायला मिळणारी दैवी कृपा प्राप्त असलेली आपली भूमी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. संपूर्ण विश्वात सर्वोत्तम नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेला हा सार्वभौम देश आहे. संपूर्ण विश्वातील मानव जातीला, पशु पक्षींना पुरून उरेल एवढे अन्नधान्य निर्माण करण्याची क्षमता असलेली ह्या देशाची उपजत भूमी आहे. अनेकांनी आक्रमणे करून ह्या देशावर सत्ता गाजवण्याचा पर्यत्न करून ही आपली भारतीय संस्कृती आणि जगा वेगळी ओळख ह्या देशाने अनादी काळापासून जपली आहे. ह्या पवित्र देशाला नैसर्गिक रित्या विधात्याने महाभारतातील महान योद्धा कर्ण सारखे स्वरक्षण कवच चहू बाजूने प्रधान केलेले आहे त्यामुळे आपला देश सदैव अजय राहणारा आहे. संपूर्ण जगातील प्रगत राष्ट्रे एखाद्यावेळेस नैसर्गिक अबदेमुळे बुडून संपतील पण भारत देश ताठ मानेने आपले अस्थित्व कायम ठेवत स्वाभिमानाने उभा राहिलेला दिसेल, ह्या बद्दल जगात कोणालाही शंका नसावी. अशा ह्या पावन भारत भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाची जबाबदारी फक्त एकच आहे की काहीही होवो, अस्मानी सुलतानी संकटे येवो आपण आपल्या मायभूमिशी गद्दारी करायची नाही. कोणत्याही परिस्थितीत आपला देश दृष्ट नजरेतून वाचवून जगवायचा त्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे ह्या देशाची नैसर्गिक साधन संपत्ती जपायला हवी किंबहुना तिच्यात आपल्या परीने वाढ करणे आपले प्रथम कर्तव्य प्रत्येकाने समजायला हवे.
अनेक भारत विरोधी देश त्यात प्रामुख्याने चीन, अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेश, तुर्कस्थान हे भारत देशाच्या वाईटावर टपले आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपने सर्वच विरोधी देश आपल्या देशाची साधन संपत्ती संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सगळ्यात प्रथम हे विरोधी देश आपल्या देशाची उपजत असलेली जमीन नापीक करण्याच्या मागे लागलेले आहेत त्यासाठी विविध मार्गाने ते विषारी घटक जमिनीत टाकून जमीन टाकावू बनवित आहेत. परक्या देशातून आयात होणाऱ्या रासायनिक खतांवर भारत देश १.८० लाख कोटी रुपये अनुदान म्हणून दर वर्षी मोजतो. ह्या वर्षी युद्ध सदृश्य परिस्थिती मुळे हा आकडा २.४१ लाख कोटीच्या घरात जाणार आहे. आपण उदाहरण अभ्यासू नत्र युक्त खत युरियाचे, नुसत्या युरियाच्या एका गोणीवर देश २७०० रुपये शेतकऱ्यांसाठी अनुदान मोजतो पण हे अनुदान देश आपल्यासाठी देतो हेच प्रत्यक्षात शेतकऱ्यांना माहीतच नाही, कारण त्याचा फायदा प्रत्यक्षात त्याला होतच नाही. मग हे अनुदान कोणाच्या खात्यावर जमा होते, त्याचा फायदा कोणाला होतो हा मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. एक मात्र नक्की मोठ्या प्रमाणावर परकीय चलनात २ लाख करोड रुपये पैसे मोजून सरकार रासायनिक खते शेतकऱ्यांसाठी आयात करतो.
केंद्र सरकारने आता सेंद्रिय शेतीला चालना देण्याचे धोरण अवलंबले आहे आणि त्यादृष्टीने पाऊल उचलायला सुरुवात केली आहे, पण त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे कारण फक्त २० टक्के शेती आपली सेंद्रिय पद्धतीत सध्याच्या घडीला मोडते आहे. हा आकडा कमीत कमी ५० टक्क्यांवर यायला हवा असे अपेक्षित आहे.
सगळ्यात मोठा धोका परक्या देशातून आयात होत असलेले वेगवेगळ्या ग्रेडचे रासायनिक खते, कीटक नाशके, बुरशी नाशके, तन नाशके ह्यांच्यात उपजत जमिनीला नापिकी कडे घेऊन जाणारे अती विषारी घटक मिसळले जात आहेत का?
विषारी रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणावर भारत देशाची जमीन आजारी, नापीक करण्यासाठी या विरोधी देशांमध्ये स्पर्धा लागली आहे असे वैयक्तिक मला तरी जाणवते. आपल्याच देशातील काही विकाऊ भिकारी लोक विरोधी देशांच्या अमिषाला बळी पडून देश विरोधी कार्य करीत आहे, एक प्रकारचे छुपे युद्ध बिनबोंबाट वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांनाच्या मार्फत सुरू आहे.
जमिनीत पिकांसाठी घातक ठरणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारातील बुरश्या ( Fungus ) प्रयोग शाळेत कृत्रिम पद्धतीने निर्माण करून भारतमातेच्या जमिनीत सोडण्याचे षडयंत्र शिजत असल्याने वासावरून जाणवत आहे. नुसती जमीनच नाही तर अमृत समान अतिउच्च पातळीवर शुद्ध असलेले भारत देशातील विविध नद्यांचे पाणी विषारी बनवण्याचे कट कारस्थान विदेशी कंपन्या मार्फत बेमालूमपणे राजरोस चालु आहे. नुसत्या जमिनी, पाण्याचे उगम स्थान दूषित करून हे थांबणार नाहीत तर त्या सोबत वातावरणात कार्बनडायऑक्साइड चे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढवून भारत देशावरील ओझोनचा थर कसा कमी करून भेदता येईल असाही छुपा अजेंडा ह्यांचा असु शकतो. नैसर्गिकरित्या वातावरणात असलेले हवेतील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ह्याचे प्रमाण व्यस्त करण्याचा कृत्रिम प्रयत्न करण्यात येत आहे जेणे करून वातावरण दूषित करून प्रचंड उष्णता निर्माण करून तापमान वाढवून निसर्ग संपदा संपवण्याचा ह्यांचा मानस आहे, गरज आहे ह्या विषयी जनजागृती करून, सावधानता बाळगून ह्यावर मात करण्यासाठी सज्ज राहण्याची.
भारतातील विविध हवामानाच्या विभागातील उपजत जमिनीतून घेण्यात येत असलेल्या विविध शेती पिके त्यात फुल पिके, फळ पिके ,भाज्या, तृणधान्य, गळीत धान्य, नगदी पिके (C4 आणि C3पिके) इत्यादी पिकांपासून अपेक्षित उत्पादन का मिळत नाही कारण जमिनीत, पाण्यात आणि वातावरणात विषारी घटक मिसळल्या गेले आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम दिवस अन् दिवस पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. प्रत्येक राज्यातील सरकारने ह्याच्यावर गांभीर्याने तातडीने विभागवार जमिनी सुधारणा करण्यासाठी उपाय योजना आखल्या गेल्या पाहिजेत आणि तातडीने नियोजन करून तत्काळ अंमलबजावणी करायला हवी, नुसत्या केंद्र सरकारच्या नियोजनावर अवलंबून राहून चालणार नाहि तर प्रत्येक राज्याला स्वतंत्र विचार या विषयावर करावा लागेल.
महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास, राज्यातील शेतातील पिकांना अती पाण्याचा, रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याने महाराष्ट्रातील जमिनी क्षारपट होत चालल्या असुन जमिनीचा सामू (pH) वाढत आहे, त्या मुळे जमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर आलेल्या असुन कोणत्याही पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेती तोट्यात जाऊन शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहे. जमिनी नापिक होण्यापासून वाचवण्यासाठी पर्यत्न होणे अत्यंत काळाची गरजआहे. जल, जमीन आणि हवामान हे घटक जोपर्यंत पिकांना पोषक होणार नाही तो पर्यन्त बळीराजा खऱ्या अर्थाने राजा होणार नाही. कृषी बाजारात शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित चांगला भाव जो पर्यन्त मिळत नाही तोपर्यंत या देशांची अर्थव्यवस्था मोठी होऊच शकणार नाही. शेती या व्यवसायाला प्रतिष्ठा देऊन, सद्यस्थितीत चालना देणे अत्यंत गरजेचे आहे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
