May 16, 2026
Sandesh Bhadare Comment on Wari And Tamasha
Home » वारी आणि तमाशातून सामान्यांचे जीवन टिपले – संदेश भंडारे
काय चाललयं अवतीभवती

वारी आणि तमाशातून सामान्यांचे जीवन टिपले – संदेश भंडारे

नागपूर : छायाचित्रकार प्रसिद्ध व्यक्तींना नेहमी टिपत असतात, मात्र सर्वसामान्यांचे जीवन तितक्या क्षमतेने टिपले जात नाही. म्हणूनच मी महाराष्ट्रातील दोन लोकपरंपरा वारी आणि तमाशा यांच्या माध्यमातून सामान्यांचे जीवन टिपण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी केले.

विदर्भ साहित्य संघाच्यावतीने भंडारे यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विदर्भ साहित्य संकुलातील अमेय दालनात लेखक समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे आणि कवी प्रफुल शिल्लेदार यांनी संदेश भंडारे यांची मुलाखत घेतली. यावेळी भंडारे म्हणाले, प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांच्या छायाचित्रातून प्रेरणा घेत छायाचित्र विश्वात प्रवेश केला. छायाचित्र काढताना विचारांची परंपरा चोवीस तास सुरू राहते. वारी आणि तमाशाने मराठी माणसाचा उदारमतवादी विचार जगासमोर आणला. तमाशात बहुतांश भटके आणि दलित समाजातील कलाकार असतात. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही योग्य नाही. तमाशाच्या माध्यमातून ते अभिव्यक्त होतात आणि मनोरंजनासोबतच समाजाचे प्रबोधनही करतात. सिनेमाने तमाशा कलेचे शोषण केले आहे. सिनेमात तमाशाचे चुकीचे वर्णन केल्याने समाजात तमाशाबाबत गैरसमज प्रस्थापित झाले, असेही भंडारे म्हणाले.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेचे साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

गावाकडचे रस्ते सुधारले, पण…

पंढरपूरच्या श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406