May 15, 2026
Kundal Krushnai Pratisthan Marathi Literature award
Home » कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानच्यावतीने उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना डिसें २०१९ मधे झाली. या प्रतिष्ठानद्वारे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. पुस्तकांमुळे माणसाचे आयुष्य समृद्ध होते, भाषेचे संवर्धन होते म्हणून उत्कृष्ट वाङमय पुरस्कार संस्थेच्यावतीने देण्यात येतात. कविता संग्रह, कथा संग्रह, कादंबरी, समीक्षा ग्रंथ, बालसाहित्य इत्यादी साहित्य प्रकारात हे पुरस्कार देण्यात येतात. तसेच ग्रामीण भागातील मराठी शाळांना मोफत बालसाहित्य संस्थेतर्फे दिले जाते. आतापर्यंत पन्नास शाळांना मोफत गोष्टींची पुस्तके दिली आहेत. शाळेत लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत गोष्ट सांगणे, प्रश्नोतरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

२०२३ चे उत्कृष्ट वाङमय विजेते असे –

पुरस्कार प्राप्त कवी –

हर्षदा सुंठणकर ( बेळगाव ) – कपडे वाळत घालणारी बार्ड
आनंद बल्लाळ ( गडहिंग्लज ) – स्वातंत्र्यानंतर अजुनही
बबन धुमाळ ( पुणे ) – नवा मोहर गळतो आहे
अमोल देशमुख ( परभणी ) – आठ फोडा आन बाहेर फेका

पुरस्कार प्राप्त कादंबरी

उर्मिला चाकूरकर, नांदेड – हिप्पोक्रेटिसची शपथ
विकास गुजर, कोल्हापूर – बाभुळमाया

पुरस्कार प्राप्त कथासंग्रह

प्रेमनाथ रामदासी, माळशिरस – फ्यूचर मॅन
भास्कर बंगाळे, पंढरपूर – वाटणी

पुरस्कार प्राप्त समीक्षा ग्रंथ

डॉ. मारोती घुगे, जालना – १९८० पूर्वीची प्राचीन कविता

पुरस्कार प्राप्त बालसाहित्य –

मुरहारी कराड, लातूर – नव्या जगाची मुले
उत्तम सदाकाळ, जुन्नर – पाऊस
वीरभद्र मिरेबाड, नांदेड – आनंदाची फुलबाग
बबन शिंदे, हिंगोली – प्रेरणादायी कथा

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

“आधी खडक फोडुनी तळी बांधावी”, छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञापत्र

पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘अशानं आसं व्हतं’ या ग्रंथाचा समावेश

कोल्हापूरमध्ये ‘Women in Tech’ या संकल्पनेला नवी दिशा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406