📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 25, 2026
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार जाहीर

Image of Manganga Sahityapremi State Awards ceremony with Marathi authors and dignitaries on stage during Dahivadi literary conference.

फलटण – येथील साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन यांच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट पुस्तकांना राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. यावर्षी दहिवडी येथे तीन डिसेंबर रोजी आयोजित साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन यांच्यावतीने जिल्हास्तरीय माणदेशी युवा स्पंदन साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, विनोद कुलकर्णी, प्रकाश होळकर, जयवंत अवघडे, स्वराज अकॅडमी चे संस्थापक सुनील काटकर, साहित्यिक संवाद युवा स्पंदन साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष महादेवराव गुंजवटे यांच्या प्रमुख उपस्थित संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

जाहीर करण्यात आलेले राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार असे – ( लेखक आणि त्यांची साहित्यकृती )

गंगाराम कुचेकर- स्त्री जन्माची शिक्षा मृत्युदंडाची
मंगल कुमावत – भूतान भटकंती,
आकाश भोरडे- झालं बाटुकाचं जिण,
सौ संध्या धर्माधिकारी – बेर,
मुकुंदराज कुलकर्णी -वटवृक्षाच्या सावलीत,
भारत सातपुते -जागरण,
रंजना सानप -स्वानंदी जगणं
राजेंद्र घाडगे -शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे,
लक्ष्मण शिंदे -हिरव्या वाटा,
डॉ स्नेहा राणे -बाळभूक,
प्रकाश पोळ- कातरवेळ,
सुनील शेडगे – रेडी ते रेवस,
सचिन अवघडे – फक्कड,
आशा नेगी -ब्युटी ऑफ लाईफ,
सुनील दबडे- बनगी आणि बिरमुट,
सतीश अंभईकर – शूरा मी वंदिले,
डॉ सोनिया कस्तुरे- हसरे किनारे,
सौ संगीता ठलाल- रानभाज्यांच्या जगात,
पल्लवी बनसोडे -अधोरेखित दिवाळी अंक

समारोप सत्रामध्ये या पुरस्काराचे वितरण रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, ज्येष्ठ विचारवंत रवींद्र येवले, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर डॉ अनिल दडस यांच्या हस्ते महावस्त्र, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तके भेट देऊन करण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशनचे अध्यक्ष व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, समन्वयक सुरेखा आवळे,सचिव राजेश पाटोळे, ज्येष्ठ साहित्यिक महादेवराव गुंजवटे, कवी मोहसीन आतार यांनी केले.

Related posts

कोल्हापूर जिल्ह्याची ‘दौलत’ ठरलेले जिल्हाधिकारी

मैत्र साहित्य पुरस्कार कवयित्री संध्या तांबे यांना जाहीर

छत्रपतींनी लोकशाही मूल्ये स्वराज्यात ज्या पद्धतीने रुजविली, त्याला तोड नाही – कुमार केतकर

Leave a Comment

1 review

Anonymous November 27, 2025 at 1:36 PM

पुरस्कार प्राप्त सर्वांचे मनापासून अभिनंदन

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!