महाराष्ट्रातील अग्रगण्य कवयित्री, बहिणाबाई चौधरी यांचा तिथीप्रमाणे आज १४७ वा जन्मदिवस.( जन्म श्रावण शु" पंचमी, शके १८०२.) त्यानिमित्ताने---
बहिणाबाई चौधरी यांचे, महाराष्ट्राला परोक्षदर्शन घडवणारी, " रानफुलास " ही रूपकात्मक कविता त्यांना सादर.
🪸 रानफुलास 🪸
🌴🌴🌴
तू सौंदर्याचा दूत गडे |
हे सत्यच खोटे कसे पड़े ?
अनेकांतले एक समजुनी |
कुणी न बघती रे तुझ्याकडे
रंगरूप अन वास तुझाचि,
खास असोनी असे घडे ||
तुझ्यासारखी फुले उमलती |
अनेक, अथवा गळून पडती |
कोणी केली त्यांची गणती ?
न्याय वनांचा चोहिकडे ||
काटा रुतता साधुपायी |
व्यथित होती जन, अनुयायी ||
द्वाड प्रभंजन तुला गांजिता, |
कुणी एक ना मुख उघडे ||
तुज भवती रे दलदल कातळ |
खुपती काटे जीवा तळमळ |
मध्येच घाली घावही काळ |
सोशिलेस तू , शर्थ गडे ||
कळले नाही तुझ्या दलांना |
तुझाच दरवळ चौबाजूंना |
स्वतेज ओळख नसे हिऱ्यांना |
आत्मस्तुति तुला नावडे ||
येथला रसिक डोळसबंदा |
कधी बनतो बहिरा – अंधा |
वारा गातो तव गुणसंथा |
त्याची तंद्री तुझ्याकडे ||
सुगंध देणे,काम तुझे ते |
भूदेवीचे रूप बहरते |
थेंब दवाचे झेलत खुलते ,
हिरवाळीचे हे रुपडे ||
एके दिवशी सारस्वताला |
तव गंधाचा दरवळ कळला |
खुडले, त्याने तुला ठेविले , ‘
हंसवाहिनी देविपुढे ||
तू वनदेवीचा दूत गडे |
हे सत्य जहाले जनउघडे |
फुलपाखरे तथा मधुकर ही,
गुंजन करती तुझ्यापुढे ||
सुखलाल नथू चौधरी,
खोपोली.
७६२०५९६२०४.
