April 28, 2026
थंड गुणधर्माची औषधी रानभाजी – 'मायाळू'. आजीच्या हातच्या पारंपरिक पाककृतीसह तिच्या आरोग्यदायी उपयोगांची माहिती.
Home » आजीची भाजी रानभाजी – मायाळू
फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजीची भाजी रानभाजी – मायाळू

‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी ‘आजीची भाजी रानभाजी’ ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची भाजी मायाळू…

प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

शास्त्रीय नाव : Basella alba
स्थानिक नाव : मायाळू

औषधी उपयोग : जखम, सूज येणे, पोटविकार यात उपयोगी

मायाळू ही बेलबोंडी या नावानेही ही ओळखली जाते. मायाळूचे वेल कोकणात सर्वत्र आढळतात. मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात. रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी देतात. गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे.

मायाळूची भजी बनवली जातात. मायाळूची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. बेसनमध्ये पाणी घालून त्यामध्ये हळद, ओवा, हिंग, मीठ, तिखट घालून मजीसाठी मिश्रण तयार करुन घ्यावे. मायाळूचे पान मिश्रणात बुडवून तेलात सोडावे. मध्यम आचेवर पलटून तळून किंचित लालसर रंग आला की काढावीत.

भाजी (भगर किंवा पीठ पेरून)
प्रथम कढईत तेल गरम करुन, मोहरी-जिरे, चिरलेला कांदा घालून फोडणी घ्यावी. परतून हळद, हिंग मिरची, गोडा मसाला घालावा. त्यावर मायाळूची स्वच्छ धूवून चिरलेली पाने घालावीत. आता थोडा वेळ पाने शिजवून मग त्यात कोरडेच बेसन भुरभुरावे. चविपुरते मीठ, साखर घालून वाफेवर मंद आचेवर शिजवून घ्या. बेसन शिजले की गॅस बंद करावा.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

स्विटकाॅर्नपासून खमंग चिवडा कसा तयार करायचा ?

वाळवी, पाने गुंडाळणारी अळी, शेंडा पोखरणारी अळी, साल खाणारी अळी…

आयुर्वेद दिवस २३ सप्टेंबरला, ही तारीख निवडण्याचे कारण…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!