राज्यात पावसाचा खंड लांबल्याने सोयाबीन आणि कापूस पिकांवर पाण्याचा ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीन फुलोरा व शेंगा लागण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. अशा वेळी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, पिकांची नियमित पाहणी आणि गरजेनुसारच फवारणी करणे आवश्यक आहे. पाण्याचा ताण असताना घाईघाईने औषधे व टॉनिक फवारण्याऐवजी प्रथम पिकांची अवस्था समजून घ्या,
✍🏻 डॉ. अनंत इंगळे
कृषी संशोधक व मार्गदर्शक
सध्याची परिस्थिती अत्यंत महत्त्वाची !
संपूर्ण राज्यात गेल्या २० दिवसांपासून पावसाचा खंड आहे. अनेक ठिकाणी एक महिन्यापेक्षा अधिक काळ पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस व इतर पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला असून काही ठिकाणी पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे.
पाण्याच्या ताणामुळे पिकांच्या वाढीवर, फुलोरा व शेंगा/बोंडांच्या विकासावर तसेच एकूण उत्पादनावर निश्चितच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
🌱 सोयाबीन पिकाचे नियोजन
🌼 फुलोरा व शेंगा लागण्याची अवस्था अत्यंत महत्त्वाची असते!
सध्या सोयाबीन पीक अनेक ठिकाणी फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. ही उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे.
⚠️ या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
💧 सोयाबीनला पाणी देणे गरजेचे
👉🏻 पाण्याची उपलब्धता असल्यास सोयाबीन पिकाला पाणी देण्यास प्राधान्य द्यावे.
👉🏻 स्प्रिंकलर किंवा पाटपाणी या दोन्ही पद्धतीने पाणी देता येऊ शकते.
👉🏻 मात्र पिकाच्या संपूर्ण क्षेत्रात पुरेसा व एकसमान ओलावा निर्माण होईल, अशा पद्धतीने पाणी देणे आवश्यक आहे.
⚠️ अल्प प्रमाणात पाणी दिल्यास अपेक्षित फायदा मिळणार नाही.
👉🏻 स्प्रिंकलरने पाणी दिल्यास पांढरी माशी तसेच इतर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
👉🏻 त्यामुळे पाण्याची उपलब्धता असल्यास पाटपाण्याने पाणी देणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
🔅 अळी व पांढरी माशीचा प्रादुर्भाव : फवारणी कधी करावी?
सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनमध्ये अळीचा तसेच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे फवारणी करावी का, हा शेतकऱ्यांसमोर महत्त्वाचा प्रश्न आहे.
⚠️ पिकावर पाण्याचा जास्त ताण असेल तर—
👉🏻 जर पीक सुकत असेल किंवा पाण्याचा जास्त ताण पडलेला असेल, तर शक्यतो फवारणी करणे टाळावे.
👉🏻 प्रथम पाणी देऊन पिकावरील ताण कमी करावा आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
✅ पाण्याचा ताण नसल्यास
👉🏻 पिकावर जास्त ताण नसताना फवारणी करायची असल्यास टॉनिकचा वापर टाळावा.
👉🏻 अनावश्यकपणे जास्त औषधांची किंवा अनेक उत्पादनांची सरळ मिश्रणे करू नये.
🌿 पाण्याचा ताण कमी करण्यासाठी फवारणीमध्ये :
🔹 Ortho Silicic Acid – ३० ml/पंप
🔹 13:0:45 – ८० ग्रॅम/पंप
याप्रमाणे वापर करता येतो.
⚠️ मात्र पिकाची अवस्था, ताणाची तीव्रता आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच फवारणीचे नियोजन करावे.
💧 पाणी दिल्यानंतर विशेष काळजी
👉🏻 पाणी दिल्यानंतर पांढरी माशी व इतर किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
👉🏻 त्यामुळे पाणी दिल्यानंतर पिकाची पाहणी करून किडींची आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊन आवश्यक असल्यास त्वरित फवारणीचे नियोजन करावे.
🌱 सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनला प्राधान्य का?
सध्या सोयाबीन, कापूस व इतर पिकांवर पाण्याचा ताण दिसून येत आहे.
मात्र सोयाबीन पीक सध्या अनेक ठिकाणी फुलोरा व शेंगा लागण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असल्यामुळे या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.
👉🏻 त्यामुळे पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास सोयाबीन पिकाला प्राधान्य देऊन पाणी देण्याचे नियोजन करावे.
✅ कापूस पिकाचे नियोजन
कापूस पिकामध्येही सध्या वाढ कमी झालेली असून पाण्याच्या ताणामुळे समस्या अधिक वाढत आहेत.
💧 कापसाला पाणी द्यावे का?
👉🏻 कापूस पिकामध्ये सध्या काही ठिकाणी जास्त ताण दिसत नसला, तरी पाण्याची उपलब्धता असल्यास पाणी देण्यास हरकत नाही.
👉🏻 पाणी दिल्यास पिकाची वाढ व जोम सुधारण्यास मदत होऊ शकते.
👉🏻 पाण्याचा ताण जास्त असल्यास त्याचा पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
🐜 रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
सध्याच्या परिस्थितीत कापूस पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
⚠️ त्यामुळे पिकाची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे.
🚫 फवारणी करताना काय करू नये?
❌ एकाच वेळी अनेक औषधे एकत्र करून फवारणी करू नये.
❌ अनावश्यक टॉनिक वापरू नये.
❌ पाण्याचा ताण असताना टॉनिक व खतांची फवारणी टाळावी.
❌ पिकावर ताण असताना अनावश्यक रासायनिक फवारणी करू नये.
फवारणीचे नियोजन
👉🏻 पिकावर जास्त पाण्याचा ताण असल्यास फवारणी करणे टाळावे.
👉🏻 प्रथम पाणी देऊन पिकावरील ताण कमी करावा आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
फवारणीमध्ये :
🔹 Ortho Silicic Acid – ३० ml/पंप
🔹 13:0:45 – ८०–१०० ग्रॅम/पंप
याप्रमाणे वापर करता येतो.
💧 *पाणी द्यावे की नाही?
👉🏻 पाणी उपलब्ध असल्यास सोयाबीन व कापूस पिकाला पाणी देण्यास हरकत नाही.
👉🏻 विशेषतः पिकावर जास्त पाण्याचा ताण असेल तर तो कमी करणे आवश्यक आहे.
👉🏻 पाण्याचा ताण जास्त काळ राहिल्यास पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
👉🏻 त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून प्रथम पिकावरील ताण कमी करावा.
👉🏻 पाणी दिल्यानंतर पिकाची पाहणी करून आवश्यकतेनुसार फवारणी करावी, जेणेकरून पिकाची वाढ व अवस्था पूर्ववत होण्यास मदत होईल.
🌾 शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाचा संदेश
🌧️ पावसाचा खंड असताना घाबरून अनावश्यक फवारण्या करू नका.
💧 पाण्याची उपलब्धता असेल तर योग्य पद्धतीने पाणी देऊन पिकावरील ताण कमी करा.
🌱 सोयाबीनच्या फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेला प्राधान्य द्यावे
🐛 किडींचे निरीक्षण करूनच आवश्यक फवारणीचे नियोजन करा.
🚫 पाण्याचा जास्त ताण असताना अनावश्यक औषधे, टॉनिक व खतांची फवारणी टाळा.
📌 सध्याच्या परिस्थितीत पिकाची अवस्था, पाण्याची उपलब्धता आणि ताणाची तीव्रता लक्षात घेऊनच निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.
