📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 5, 2026
काय चाललयं अवतीभवती

उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी ‘आशीर्वाद पुरस्कार’ – पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Ashirwad Award announcement for Marathi, Hindi and English literature by Vandana Prakashan

मुंबई : येथील वंदना प्रकाशन संस्थेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्यप्रकारांना ‘आशीर्वाद पुरस्कार’ प्रदान केला जातो. सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, इच्छुक लेखक, लेखिका, कवी, कवयित्री, प्रकाशक, वितरक व साहित्य क्षेत्राशी संबंधितांनी या पुरस्कारासाठी आपली पुस्तके पाठवावीत, असे आवाहन डॉ. सुनील सावंत यांनी केले आहे.

१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती, लेखकाचा/लेखिकेचा एक छायाचित्र व अतिअल्प परिचयासह येत्या २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पाठवाव्यात. ‘आशीर्वाद पुरस्कार’ प्रदान सोहळा दिवाळीपूर्वी किंवा नंतर नोव्हेंबर २०२६ मध्ये मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता :
डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक व संस्थापक – ‘आशीर्वाद पुरस्कार’
६०४, चंद्रदर्शन, आर. के. वैद्य मार्ग,
प्लाझा सिनेमा समोर, दादर (पश्चिम),
मुंबई – ४०० ०२८

सुखात्मक संवाद : ९८१९१८२३२९

Related posts

स्वाभिमानीतर्फे शिवाजी विद्यापीठात नांगरट साहित्य संमेलनाचे आयोजन

राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर

महिलांचे निर्णयप्रक्रियेत समावेशन आवश्यक: खासदार सुप्रिया सुळे

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406