📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 15, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गणेशाला दुर्वाच का प्रिय ? या हिरव्या पात्यांमध्ये दडलंय आयुर्वेदाचं गुपित !

गणेशाला दुर्वा का प्रिय आहे? २१ दुर्वा अर्पण करण्यामागची पुराणकथा आणि दुर्वेचे पित्तशामक, रक्तस्तंभक व आरोग्यदायी आयुर्वेदिक महत्त्व जाणून घ्या.

श्री गणेशाचे आगमन झाले आहे. आपण गणेशाला कित्येक वस्तू अर्पण करतो नैवेद्य असो, प्रसाद असो वेगवेगळ्या वनस्पती असो, फुल असो पण…या प्रत्येक वस्तूत काही महत्त्व आहे का ? किंवा आपण हे अमुकच तमुकच का वाहतो ? याचा कधी विचार केला आहे का? आयुर्वेदाच्या दृष्टीने काही यात दडलं आहे का? हे आज आपण जाणून डॉ. राधा खडक्कार यांच्याकडून जाणून घेणार आहोत…

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे जा:

गणेशाची एक आवडती वनस्पती म्हणजेच दुर्वा. तुम्ही कधी विचार केला आहे का आपण दुर्वा गणेशाला का वाहतो किंवा गणेशाला ही एवढी प्रिय का आहे? तर यामागे एक छोटीशी कहाणी सुद्धा आहे आणि या दुर्वांना आयुर्वेदाच्या दृष्टीने फार उत्तम महत्त्व आहे; तर आपण हे दोन्ही बघूया.

प्राचीन काळी अनसुराचा एक राक्षस होता, त्यांनी जगात खूप हाहाकार माजवला होता. आता त्याचा वध करायचा होता, तर सगळे जण शंकराकडे गेले. शंकर म्हणाले की याचा वध फक्त श्री गणेशच करू शकतात.तर श्री गणेश गेले आणि त्यांनी या अनसुराच्या राक्षसाला जिवंतच गिळून घेतले. आता जिवंत गिळल्यामुळे त्यांच्या अंगाची खूप आग झाली, दाह झाला, जळजळ झाली, त्यांना काही ते सहन होईना. सगळे प्रयत्न झाले पण ती आग काही मिटे ना.मग ८८,००० ऋषींनी २१ दुर्वांची जोडी, प्रत्येकी २१ दुर्वांची जोडी श्री गणेशाच्या मस्तकावर ठेवली. आता ही दुर्वा शीत असल्यामुळे म्हणजेच थंड या गुणधर्माची असल्यामुळे श्री गणेशाची आग ही लगेच शांत झाली, त्यांची जळजळ शांत झाली.

हा शीत गुण तर आहेच, पण अजून काय काय गुण आहे या दुर्वामध्ये ते आपण पाहूया. तर दुर्वा ही पित्त, मधुर आणि कशाय रसाची आहे. तिचा वीर्य शीत आहे, जसं आपण आता पाहिलं, त्यामुळे ही पित्त कमी करते. ज्यांना कोणाला पित्ताचा त्रास आहे, ती ही दुर्वा आपण वापरू शकतो.

तसेच ही रक्तस्तंभन म्हणजेच रक्तस्त्राव थांबवणारी आहे. नाकफुटी म्हणजेच ज्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतं, त्यांनी ही दुर्वा वापरली तर त्याचा फायदा होतो.

दुर्वा कशी वापरावी

महिलांमध्ये पिरेड्सचा प्रॉब्लेम असतो. खूप जणांना अत्याधिक रक्तस्त्राव म्हणजे पिरेडचा फ्लो खूप जास्त असतो, त्यात सुद्धा ही दुर्वा अत्यंत उपयोगी पडते.

हरपीस हा सगळ्यांना रोग माहिती आहे. हरपीसमध्ये आपण या दुर्वाचा वापर लेपनार्थ म्हणजे शरीराला लेप लावण्यासाठी करू शकतो, पण तो कसा करायचा याची सुद्धा एक पद्धत आहे.

दुर्वा ही वृश्य आहे, म्हणजेच ही शुक्रवृद्धी करते. प्रेगनेंसीमध्ये हिचा फार चांगला उपयोग होतो. ही गर्भधारणा, गर्भाची स्थिरता आणि संतती प्राप्तीसाठी अगदी उत्तम आहे.

ही व्रणांमध्ये म्हणजेच जिथे जखम झाली आहे, तिथे सुद्धा ही काम करते. तिच्या या मधुर शीत गुणांनी व्रण लवकर भरून येतो.

आणि अजून एक खूप सुंदर उल्लेख दिला आहे की ही दुर्वा रक्षोघ्न आहे. म्हणजे काय? ही बाळाचं रक्षण करते, त्याला बळ आणि आरोग्य देते. म्हणूनच ही दुर्वा बाळांच्या दोन्ही हातामध्ये, मस्तकामध्ये म्हणजे मस्तकाच्या वर किंवा गळ्याच्या भोवती धारण करावी असा उल्लेख आहे, पण ही कशी करावी हे तुम्ही तुमच्या जाणकारांकडून किंवा वैद्यांकडून एकदा खात्रीशीर करावी.

आता ही अशी दुर्वा प्रत्येक रोगानुसार किंवा इतर वेळेस सुद्धा कशी वापरावी, त्याचे कोणकोणते कल्प मिळतात किंवा लेपासाठी आपण कसा वापर करू शकतो हिचा, हे तुम्ही जवळच्या वैद्याकडून जरूर जाणून घ्यावे.

तर आपली ही अशी दुर्वा आहे आणि आपण हे दहा दिवस सलग एक एक गोष्ट जाणून घेणार आहोत. तर फक्त गणेशाला अर्पण म्हणून नाही, तर जे आपण अर्पण करत आहोत त्याचं काय महत्त्व आहे, त्याच्या मागे काय गोष्ट आहे किंवा हे का आवडतं आणि त्याच्या आयुर्वेद दृष्टिकोनातून काय महत्त्व दिलं आहे, हे सगळं आपण जाणून घेऊ यात. हे जाणून घेतल्याने त्याचे आणखीनच महत्त्व वाढेल. नमस्कार!

Related posts

महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळी पावसाचे वातावरण

‘मिरुग…!’

माती परीक्षण – उत्पादन वाढीची पहिली पायरी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406