📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 4, 2026
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

Maharashtra Sahitya Parishad Pune Marathi Literature award

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या वतीने दरवर्षी, मराठी राजभाषा दिनानिमित्त काही विशेष पुरस्कार दिले जातात. सन २०२३ च्या या विविध पुरस्कारांसाठी, २०२२ साली  (१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२) प्रकाशित झालेल्या ग्रंथांच्या २ मागवण्यात येत आहेत. 

कै. निर्मला मोने पुरस्कार हा ललित लेखनासाठी, कै. रा. श्री जोग पुरस्कार समीक्षा ग्रंथांसाठी, कै. सुहासिनी इर्लेकर पुरस्कार नवोदित कवीच्या पहिल्या कवितासंग्रहासाठी, कै. शं. ना. जोशी पुरस्कार सामाजिक/ सांस्कृतिक/वैचारिक लेखांच्या पुस्तकासाठी, कै. द. वा. पोतदार पुरस्कार हा इतिहासविषयक पुस्तकासाठी देण्यात येतो.

सन २०२१ आणि २२ या दोन वर्षात प्रकाशित कविता संग्रहासाठी कुसुमाग्रज पुरस्कार देण्यात येतो. तरी या पुरस्कारासाठी साहित्यिक, प्रकाशकांनी २५ जानेवारी २०२३ पर्यंत कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे-४११०३० यांचे कडे पुस्तके पाठवावीत, असे आवाहन मसापच्यावतीने करण्यात आले आहे.

Related posts

घाटकरवाडीतील गंगाचंद्र साहित्य सेवा मंचचे काव्य पुरस्कार जाहीर

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

जूनचा शेवटचा आठवडा पावसाचा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406