📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 5, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पावसाचा जोर आणखी किती दिवस ? द्वादशीनंतर हवामानात काय बदल होणार ? Rain Forecast for Maharashtra

Heavy rain is likely to continue across Maharashtra until Ashadhi Ekadashi (July 25), followed by a brief dry spell in parts of the state, says veteran meteorologist Manikrao Khule.
आषाढी एकादशीपर्यन्त पावसाचे सातत्य कायम

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा.त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

१- गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात दुसऱ्या आवर्तनातील सुरु असलेला मध्यम ते मुसळधार पाऊस अजुन पुढील पाच दिवस म्हणजे मोठ्या एकादशी(शनिवार दि. २५ जुलै, पंढरपूर यात्रे) पर्यन्त कायम राहण्याची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः आजच्यासारखाच उद्या व परवा(२२-२३ जुलै) ला पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता जाणवते.

२-द्वादशीपासुन उघडीप

          रविवार दि. २६ जुलै(द्वादशी)ते शुक्रवार दि. ३१ जुलै (महिनाअखेर) पर्यंतच्या सहा दिवसात मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक ते सांगली सोलापूरपर्यंतच्या १० व मराठवाड्यातील ८ अश्या १८ जिल्ह्यात काहीशी  उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते.मुंबईसह कोकण व  विदर्भात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता ही कायम आहे..

३-उघडीप कश्यामुळे?

i)पावसाळी हंगामातील महाराष्ट्रातील पावसाला पूरक ठरणारा देशाच्या मध्यावरील दिड किमी.उंचीपर्यंतचा पुर्वो-पश्चिम हवेच्या कमी दाबाचा आस त्याच्या सरासरी जागेपासून पुन्हा अधिक उत्तरेकडे यू पी राज्याकडे कडे सरकण्याची शक्यता आहे.

व ii)बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र हे पूर्व उत्तरप्रदेश कडे सरकण्याच्या शक्यतेतून अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस पावसाचा जोर कमी होवून मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काहीशी उघडीप जाणवणार आहे.

४-आता मध्य महाराष्ट्रात पावसाला पुन्हा कधी सुरवात होवू शकते ?
        
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील पुढील पाऊस वा पुढील उघडीपी संबंधीचा खुलासा रविवार दि.२ ऑगस्ट (संकष्टचतुर्थी) दरम्यान तयार होण्याऱ्या वातावरणीय प्रणाल्यांच्या निर्मिती शक्यतेच्या आधारावरच खुलासा करता येईल,असे वाटते.     
       
५-भू -जल,धरणे व इतर जलाशये यांच्या पाणी पातळीतील वाढीसंबंधी पुढील खुलासा काय असु शकतो?

जुलै महिन्यातील २ ते ८ व १७ ते २५ जुलै दरम्यान झालेल्या पावसाने धरणे व इतर जलाशयात साठवणीत विशेष नसली तरी काहीशी वाढ झाली आहे. ऑक्टोबर अखेर नक्कीच पाणी पातळीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

Related posts

देशातर्गत कापसाचे भाव पाडण्याचा केंद्र सरकारचा डाव – किसान सभेचा आरोप

क्षणात पकडलेले सहजीवन : सनबर्ड आणि कृष्णकमळाची निसर्गकथा

कायद्याचा शेतकऱ्यांवर असा झाला परिणाम…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406