📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 11, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुरुवारपासून पावसाची उघडीप !

No rains from Thursday Manikrao Khule comment

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

  • ‘ गुरुवार(२४) पासून पावसाची उघडीप! ‘ ‘आज व उद्या मुंबईत पाऊस
  • ‘ २६ ते २९ दरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता
  • ‘ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही.’               

गुरुवार ( दि.२४ ऑक्टोबर) पासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप मिळू शकते, असे वाटते. परंतु शनिवार (दि. २६ ) ते मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर) पर्यंतच्या चार दिवसात दक्षिण महाराष्ट्रात, नगर,  पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अश्या १८ जिल्ह्यात  ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता जाणवते.

मुंबईत मात्र आज व उद्या (दि. २१ व २२ ला ) जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. एक नोव्हेंबर नंतर पावसाची पूर्णतः उघडीप मिळू शकते, असे वाटते.

थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर व अंदमान बेटांच्या उत्तरेला, बंगालच्या उपसागरात आज तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राचे, उद्या (दि. २२ ला) तीव्र कमी दाब क्षेत्रात तर परवा (दि. २३ ला) चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते. गुरुवारी (दि.२४ ऑक्टोबरला) ओरिसा व पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ह्या चक्रीवादळापासून कोणताही धोका नाही.

Related posts

वालुग : कृषी – पशुपालक संस्कृतीचा जिवंत आलेख

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’

किटकांच्या दुनियेत – फुलपाखरू अन् पतंग

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406