📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 31, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नारायणगाव येथे १९ नोव्हेंबरला नैसर्गिक शेती प्रशिक्षण

नारायणगाव येथे १९ नोव्हेंबर रोजी नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे मोफत प्रशिक्षण. जीवामृत, बीजामृत, दशपर्ण अर्क यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – कृषी विज्ञान केंद्राचे ( KVK ) आवाहन

नारायणगाव (पुणे) – येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या (KVK) वतीने नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत “नैसर्गिक निविष्ठा निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम” आयोजित केला आहे. बुधवारी ( ता. १९ नोव्हेंबर २०२५ ) रोजी शेतकऱ्यांसाठी हे मोफत प्रशिक्षण असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या तर्फे करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणात जीवामृत, बीजामृत, दशपर्ण अर्क इत्यादी नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती, त्यांचे फायदे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले जाणार आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी नैसर्गिक निविष्ठा अत्यंत उपयुक्त असून हा कमी खर्चिक उपाय आहे.

रासायनिक खतांवरील अवलंबन कमी करून पर्यावरणस्नेही शेतीकडे वाटचाल करण्यासाठी असे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नैसर्गिक निविष्ठा स्वतः तयार करण्याचे कौशल्य आत्मसात करावे. बुधवारी ( ता. १९ ) सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (KVK, Narayangaon) येथे हे प्रशिक्षण होणार आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी योगेश यादव (मुद्राशास्त्रज्ञ ): ८२७५००५२१२ व राहुल घाटगे (कृषी विस्तार तज्ञ): ९४२२०८००११ यांच्याशी संपर्क साधावा.

Related posts

भारत आणि न्यूझीलंड यांची ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

बाईल गेली अन् झोपा केला’: महाराष्ट्रातील नद्यांवर उशिरा आलेलं शहाणपण

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406