📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 11, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जेऊरला थंडीची लाट तर जळगांव, डहाणूला लाटेसदृश्य स्थिती

जेऊरमध्ये १० अंश से. तापमानासह थंडीची लाट; जळगाव व डहाणू येथेही थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती. हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचे विश्लेषण व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

थंडीची लाट-

जेऊर ला आज १० अंश से. इतके किमान तापमान नोंदवून तेथे थंडीची लाट अनुभवली गेली. हे किमान तापमान सरासरीपेक्षा जवळपास पाच डिग्रीने खालावलेले आहे. जेऊर चे कमाल तापमानही ३१ अंश से. नोंदवून सरासरीच्या २.१ अंश से.ने हे तापमान खालावलेले आहे.

थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती-

 १०.५ अंश से. इतके किमान तापमान नोंदवून  जळगांव मध्ये लाटेसदृश्य स्थिती आज दुसऱ्या दिवशीही जाणवली.  हे किमान तापमान, सरासरीपेक्षा  पाच प्लस इतक्या डिग्रीने खालावलेले आहे. कमाल तापमानही सरासरीच्या २.५ अंश से.ने घट होवून ३१ अंश से. इतके नोंदवले गेले. कोकणातील डहाणू येथेही आज जवळपास काहीशी थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती जाणवली.

उत्तर महाराष्ट्र उत्तर विदर्भात थंडी वाढण्याची शक्यता –
       
आज पासून महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर व उत्तर अहिल्या नगर अश्या सहा जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने तर विदर्भात २ डिग्रीने किमान तापमान खालावून सप्ताहभर म्हणजे शनिवार दि. १५ नोव्हेंबर पर्यन्त चांगल्या थंडीची शक्यता जाणवते.

एका शेतकऱ्याचा प्रश्न – 👇

प्रश्न- अगोदर नगरला सर्वात कमी तापमान असायचे नंतर निफाड, जळगाव, मग आता जेऊर कसे?

माणिकराव खुळे – जेऊर हे करमाळा तालुका  जिल्हा सोलापूर. नगर जिल्ह्याच्या सीमेवर लागून असलेले गांव असुन त्याची भौगोलिक रचना जवळपास अहिल्यानगर शहरासारखीच आहे. आज जेऊर ला सकाळी ०८:३० ला हवामान घटकांच्या निरीक्षणाची नोंद करतांना महाराष्ट्रात सगळ्यात कमी सापेक्ष आर्द्रता  जेऊरला ५७ % नोंदली गेली आहे. तर परभणीला ५३ % नोंदली गेली आहे. सापेक्ष आर्द्रता हवेत सामावलेले पाण्याचे प्रमाण म्हणजेच हवेतील कोरडे पणा दर्शवते. सध्या ह्या तेथील कोरडेपणानेच तेथील पहाटे ५ चे किमान तापमान घटवले आहे.

एखाद्या ठराविक तापमानाला 👇
सापेक्ष आर्द्रता= (हवेत प्रत्यक्षात असलेल्या पाण्याच्या वाफेचे वजन ÷ त्या हवेत जास्तीत जास्त पाण्याची वाफ सामावू शकते, तिचे वजन ) X१००%

Related posts

शेवगा लागवड मातीच्या आरोग्यासाठी

आता शेतातच समजणार पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव

अमेरिका–भारत अंतरिम व्यापार करार शेतकऱ्यांच्या हितावर घाला – संयुक्त किसान मोर्चाचा आरोप

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406