📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 25, 2026
काय चाललयं अवतीभवती

पसायदान प्रतिष्ठानचे काव्य पुरस्कार जाहीर

Guhagar Pasaydan Pratishan Kavya award

गुहागर – येथील पसायदान प्रतिष्ठान, सह्याद्री समाचार न्यूज चॅनेल आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने पसायदान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे संमेलन रविवारी ( २० ऑगस्ट ) रोजी होत आहे. यामध्ये पसायदान काव्यपुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

रोख रक्कम तीन हजार ,शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानिमित्ताने पसायदान राज्यस्तरिय निमंत्रितांचे कविसंमेलनही होणार आहे. पसायदान राज्यस्तरिय निमंत्रितांचे कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रभाकर साळेगावकर (बीड) यांची निवड करण्यात आली आहे.

पसायदान राज्यस्तरिय काव्यपुरस्कार २०१२ असे –

घामाची ओल धरून – कवी आबासाहेब पाटील (घुणकी मंगसुळी, बेळगाव )
झाडोरा – डॉ. श्रीकांत पाटील (कोल्हापुर, घुणकी)
सांजात – तहसीलदार व कवी प्रताप वाघमारे (नागपूर)

आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. संतोष कांबळे, गीतेश शिंदे, सचिन गांगुर्डे, डी के शेख, संजय चौधरी, मांगीलाल राठोड, साईनाथ पाचारणे, अनिल पाटील, प्रमोदकुमार अणेराव ,रमजान मु्ल्ला, हबीब भंडारे, माधुरी मरकड, प्रतिभा सराफ आदींचा यामध्ये समावेश आहे.

Related posts

शिव बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील

रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा

नानायण…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!