📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 13, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जळगांवात तीव्र थंडीची लाट तर नाशिक व यवतमाळ झुकत आहे थंडीच्या लाटेकडे

जळगावात ९.१ अंश से. किमान तापमान; थंडीची तीव्र लाट. नाशिक, यवतमाळ, विदर्भातही थंडी वाढली असून १५ नोव्हेंबरपर्यंत थंडीची चाहूल कायम राहणार.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

जळगांवात तीव्र थंडीची लाट-

                    जळगांवला आज पहाटे पाच वाजता ९.१ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन सरासरीपेक्षा ६.२ इतक्या अंश से. ने ते खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची तीव्र लाट अनुभवली गेली. जळगांवचे दुपारी ३ चे कमाल तापमानही २९.८ अंश से. इतके नोंदवून सरासरीच्या ३.७ अंश से.ने हे तापमान खालावलेले आहे. त्यामुळे तेथे व लगतच्या परिसरात रात्री बरोबर दिवसाही हूड-हुडी जाणवली.
        
थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती –

महाराष्ट्रातील डहाणू, नाशिक, मालेगाव, बीड, यवतमाळ  ह्या शहरांबरोबरच संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.

थंडीचे दिवस –

आजपासुन नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर सह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा व खान्देश मधील २६ जिल्ह्यांत पुढील ४ दिवस म्हणजे शनिवार दि. १५ नोव्हेंबर (लहान एकादशी, आळंदी यात्रे)पर्यंत सध्य:स्थितीत रात्री जाणवणारी थंडीसारखी थंडी जाणवेल, असे वाटते.                

Related posts

कांदा, टोमॅटो, बटाटा लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढ

सध्यस्थितीत मातीचे संरक्षण अन् गुणवत्ता जतन करणे हेच प्रमुख आंतरराष्ट्रीय ध्येय

तरोट्याचे उपयोग अन् पाककृती

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406