📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 11, 2026
कविता

नाही हरायचे…

Nahee Harayache Poem By Ajay Ramesh Chavan

नाही हरायचे.….

आलो तसा मज । नाही मरायचे ।
नाही हरायचे । समस्यांना ।।

काय म्हणतील । कोण आपल्यास ।
विसरणे यास । मज आहे ।।

म्हणणारे तर । काहीही म्हणेल ।
आपल्या हसेल । प्रयत्नास ।।

मग काय आता । प्रयत्न सोडावे ।
जीवन जगावे । मृत्यूसम ? ।।

दुर्जन हसेल । त्यांना हसू देणे ।
काय त्रास घेणे । बिनकामी ? ।।

सज्जनांची साथ । हवी आहे फक्त ।
बनेल सशक्त । त्यांच्यामुळे ।।

नराधमांमुळे । क्षय कर्तव्याचा ।
नाही जगण्याचा । यात मार्ग ।।

अशा माणसांची । सावलीही नको ।
कदापिही नको । त्यांची साथ ।।

देशासाठी कर्म । चांगले करणे ।
हसत मरणे । अंतःकाळी ।।

नाही मनामध्ये । विकार पाळणे ।
विचार करणे । निर्मळची ।।

अजुला अज्ञान । दूर सारायचे ।
आहे जिंकायचे । निश्चितच ।।

कवी – अजय रमेश चव्हाण,
तरनोळी, ता. दारव्हा, जि.यवतमाळ

Related posts

अद्याक्षरावरून आषाढी एकादशी कविता

तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदय

पांडूरंग पांडूरंग

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406