📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 13, 2026
कविता

…अशांचीच झाली शेती

Shripad Bhalchandr Joshi Poem on weeds farming

अशांचीच झाली शेती

अज्ञान्यांच्या हाती
मंडळे ज्ञानाची
भडकते ज्योत
अशाने अज्ञानाची

अंधारात सुख,
सौख्य अंधारात,
मिळून ते सारे
छान जपतात

दिसणार कशी
त्यांना विद्येची
ती झाडे, दिसणार कशी
आलेली त्याला फुले

अविद्येचेच
कवाड, आहे
केले त्यांनी
खुले

तेच देव आणि
तेच भक्त त्यांचे
ताटही त्यांचे,
नैवेद्यही त्यांचे

फिरवून पाणी
आपल्याच भोवताल
ग्रहण सारेच
करून घेती

अशांचेच
आले पीक,
अशांचीच झाली
शेती

– श्रीपाद भालचंद्र जोशी

Related posts

संसाराचा गाडा…

मनाची पालखी…

मुसळधार पाऊस

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406