📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 10, 2026
काय चाललयं अवतीभवती

यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे साहित्य पुरस्कार जाहीर

Yashwantrao Date Memorial Foundation Literary Award announced

वर्धा – येथील यशवंतराव दाते संस्थेचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण मार्च महिन्यात मान्यवर साहित्यिकाच्या उपस्थितीत वर्धा येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम व सचिव संजय इंगळे तिगावकर यांनी दिली आहे.

मराठीतील स्त्रीवादी साहित्य व चळवळीला प्राधान्य देणाऱ्या साहित्याकृतीस संस्थे मार्फत “अंजनाबाई इंगळे स्त्रीवादी साहित्य पुरस्कार” दिला जातो. २०२० – २१ चा पुरस्कार संभाजीनगर येथील डॉ. दादा गोरे ह्यांच्या ‘स्त्रियांचे समकालीन साहित्य ‘ या पुस्तकास तर २०२२ चा पुरस्कार डॉ. सुनीता सावरकर ह्यांच्या ‘ढोर चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’ या पुस्तकास जाहीर झाला आहे. तसेच २०२३ चा पुरस्कार मेहकर येथील किरण डोंगरदिवे यांच्या ‘काव्य प्रदेशातील स्त्री’ या पुस्तकास जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रोख, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र व बृहन महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशन गृह व प्रतिथयश लेखकांकडून प्राप्त साहित्य कृतीतून उत्कृष्ट पुस्तकाची निवड केली जाते, असे निमंत्रक डॉ . राजेंद्र मुंढे यांनी सांगितले.

किरण डोंगरदिवे यांना आत्तापर्यंत काव्यप्रदेशातील स्त्री ह्या त्यांच्या बहुचर्चित ग्रंथाला विदर्भ साहित्य संघाचा कुसुमानिल, बहुजन साहित्य संघ, बापूसाहेब ठाकरे स्मृती पुरस्कार, जयराम गायकवाड स्मृती समीक्षा, सुर्यकांता पोटे समीक्षा पुरस्कार, पद्मगंधा प्रतिष्ठानचा मंदाकिनी लोही समीक्षा पुरस्कार, आणि संस्कार भारतीचा स्व कल्पना व्यवहारे समीक्षा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. समीक्षेची नवी दिशा ठरविणारा ग्रंथ म्हणून हा ग्रंथ ओळखला जातो.

Related posts

स्वांत सुखाय वृत्तीमुळे भाषेचे नुकसान

शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार नांगरमुठी कादंबरीला जाहीर

सावधान ! मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरु

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406