📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 7, 2026
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

Gavgada Marathi Rural Literature award

वडशिवणे ता. करमाळा, जि. सोलापूर येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना गावगाडा साहित्य पुरस्कार दिला जातो. २०२३ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष सोमनाथ टकले यांनी दिली.

पुरस्काराचे १३ वे वर्ष असून २०२३ चे विजेते असे –

गावगाडा साहित्य पुरस्कार तान्हाजी बोऱ्हाडे (पुणे ) यांच्या जळताना भुई पायतळी या काव्यसंग्रहास देण्यात आला आहे. मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार डॉ. दयासागर बन्ने ( सांगली ) यांच्या समकालीन साहित्या स्वाद ‘ या समिक्षाग्रंथास व प्रा. रामचंद्र इकारे (बार्शी ) यांच्या माणुसकीचं आभाळ या काव्यसंग्रहास देण्यात आला आहे.

मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृति पुरस्कार गणपत जाधव (अकलूज) यांच्या हावळा या कथासंग्रहास देण्यात आला आहे. मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार नागू वीरकर ( सातारा ) यांच्या हेडाम या कादंबरीस व मानसी चिटणीस (पुणे ) यांच्या माझ्यातल्या बुद्धाचा शोध’ या काव्यसंग्रहास देण्यात आला आहे.

गावगाडा इतिहास संशोधन पुरस्कार सरला भिरुड ( पुणे ) यांच्या ‘उत्तर दक्षिणचे प्रवेशद्वार बऱ्हाणपुर’ या संशोधनास देण्यात आला आहे. गावगाडा कलारत्न पुरस्कार सुहास सुतार ( वैराग ) यांना शिल्पकलेसाठी तर गावगाडा प्रबोधन साहित्य पुरस्कार दिनेश आदलिंग (बारामती) यांना देण्यात आला आहे.

पुरस्कार संयोजन समितीमध्ये अध्यक्ष सोमनाथ टकले, प्रा बाबुराव इंगळे, डॉ जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, डॉ प्रा संजय चौधरी, प्रज्ञा दीक्षित, डॉ. प्रा. संतोष साळुंखे, डॉ. प्रा मच्छिंद्र नांगरे, हरिश्चंद्र साळुंखे, सखाराम राऊत गुरुजी, रेवननाथ टकले यांचा समावेश आहे.

Related posts

त्रैमासिक वारूळ तर्फे साहित्य पुरस्कार जाहीर

स्मृतीशेष चमेली-भाऊराव हिंगोणेकर प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

अरागाम, काश्मीर येथे होणार दुसरे विश्व पंजाबी साहित्य संमेलन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406