📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 9, 2026
काय चाललयं अवतीभवती

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Senior historian Dr Jaisingrao Pawar from Kolhapur known for research on Chhatrapati Shivaji Maharaj and Maratha history

कोल्हापूर – ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार ( वय ८५ ) यांचे आज पहाटे निधन झाले. प्रकृती बरी नसतानाही त्यांनी इतिहासाचा जागर शेवटपर्यंत त्यांनी कायम ठेवला होता.

महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन परंपरेत प्रा. जयसिंगराव पवार यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून त्यांनी मराठा इतिहासाचे अनेक पैलू उलगडून दाखवले. पुराव्याधारित इतिहास लेखनाची परंपरा बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन हे महाराष्ट्राच्या बौद्धिक परंपरेतील महत्त्वाचे योगदान आहे. इतिहास हा केवळ भूतकाळाचा आलेख नसून समाजाला दिशा देणारा ज्ञानस्रोत आहे, ही जाणीव त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रात डॉ. पवार यांचे स्थान कायम आदराचे राहील.

इतिहास संशोधनाबरोबरच जयसिंगराव पवार यांनी व्याख्यानमालेच्या माध्यमातूनही इतिहासप्रबोधनाचे कार्य केले. महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्था, साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी इतिहास विषयावर व्याख्याने दिली. या व्याख्यानांमध्ये ते शिवचरित्रातील अनेक घटनांचा अभ्यासपूर्ण उहापोह करतात. शिवाजी महाराजांचे नेतृत्व, स्वराज्य संकल्पना आणि त्या काळातील सामाजिक परिस्थिती यांचे विश्लेषण करून ते इतिहास समजावून सांगतात. त्यांच्या व्याख्यानशैलीत विद्वत्तेबरोबरच ओघवती भाषा आणि उदाहरणांचा वापर असल्यामुळे श्रोत्यांना इतिहास समजून घेणे सोपे जात होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु पाटगावचे परमपूज्य मौनी महाराज यांच्या संशोधनाच्या निमित्ताने त्यांच्याशी नेहमीच संपर्क होता. मौनी महाराज यांचा इतिहास सांगणारे संकेतस्थळ काढण्यात त्यांची खूप मोलाची मदत झाली. शिवाजी महाराज यांची तेरा संतांची भेट घेतली होती. गुरुस्थानी त्यांना मानले होते. या संतांची माहिती व पुरावे त्यांच्याकडूनच आम्हाला उपलब्ध झाले होते. पुराव्याधारित इतिहास लेखणाची परंपरा त्यांनी बळकट केली.

राजेंद्र घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी

Related posts

आंतर विद्याशाखीय परिषदेत होणार मराठा किल्ल्यांचे संशोधन

नव्या कृषी कायद्यावर कृषी तज्ज्ञांचे मत…

कोरोनाच्या विधायक बाजूंचा पहिला लेखाजोखा – लढा कोरोनाशी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406