📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 7, 2026
कविता

मराठवाडा आज पाण्यामध्ये सडत आहे…

संदीप जगताप यांच्या कवितेत मराठवाड्यातील पुरस्थितीचे चित्रण – वाहून गेलेले जनावरं, बुडालेली पिकं आणि शेतकऱ्यांच्या जगण्यासाठीची हाक.

संदीप जगताप यांची कविता….मराठवाड्यातील सध्य परिस्थितीचे वर्णन…

सोयाबिन गेले, कपाशी बुडाली, नदी गावामधुन वाहीली,
गल्ली मधून बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहीली

म्हशी बुडताना, गायी वाहताना, दाव सोडता आले नाही
वावरा मध्ये राबणाऱ्या बैलाला बाहेर काढता आले नाही

जिथे लोक आधी उन्हामुळे होरपळत होते
आणि आता पाण्यामुळे सडत आहेत

सोयाबीन आणि कपाशीचे पीक वाया गेले आहे
नदी गावामधून वाहिली आहे
गल्लीमध्ये आयुष्यात पहिल्यांदा बोट फिरताना पाहिली

म्हैशी आणि गाई पुरात वाहून गेल्या आहेत,
त्यांना वाचवता आले नाही
शेतात राबणाऱ्या बैलांना बाहेर काढता आले नाही

माती खरवडली, वावर खचलं, आयुष्यच टिचलं
आता कसं जगायचं, अख्ख आभाळच कोसळलं

कोणाकडे काय मागायचं, अख्ख आभाळच कोसळलं
मदत म्हणून थोडा आधाराचा श्वास धाडा

कारण काल उन्हामध्ये जळत होता
मराठवाडा आज पाण्यामध्ये सडत आहे

Related posts

गोकूळी हवा धूंद आहे

हेलिकॉप्टरमधून दीपक उगारे यांनी टिपलेले नायगरा धबधबा परिसराचे अप्रतिम दृश्य

विनावाहक धावणारी रिक्षा…!

Leave a Comment

2 reviews

Jalindar Uttam Masalkar November 8, 2025 at 12:20 PM
9850202104
Jalindar November 8, 2025 at 12:18 PM

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406