📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 26, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. थंडीचीही लागू शकते चाहूल !

no chance of rain in Maharashtra

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणीशेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, थंडीचीही लागू शकते चाहूल !

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवतोच, पण लवकरच थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान कोकण मध्य महाराष्ट्रात सरासरी इतके तर विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा २ डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे ३३ डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे.

तसेच पहाटेचे किमान तापमान मात्र विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ४ डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे २१ डिग्री से. ग्रेडच्या आसपास आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणासहित अजुन ऑक्टोबर हिटचा परिणाम महाराष्ट्रात अजुन ३ ते ४ दिवस म्हणजे सोमवार दि. ४ नोव्हेंबर पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवते.

परंतु वायव्यई व पूर्व भारतात, उद्यापासून पुढील पाच दिवस पहाटेचे किमान तापमानात अंदाजे २ ते ३ डिग्री से. ग्रेड ने घट होण्याच्या शक्यतेमुळे, मंगळवार दि. ५ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रातही निरभ्र आकाशासहित पहाटेचे किमान तापमानात सध्यापेक्षा हळूहळू ५ डिग्री से.ग्रेड ने खालावून १५ ते १६ डिग्री से. ग्रेड पर्यन्त खाली घसरण होवु शकते, असे वाटते.

त्यामुळे मंगळवार दि. ५ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात जोरदार नव्हे पण हळूहळू थंडीची काहीशी अपेक्षा करू या !सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही.

Related posts

महाराष्ट्रात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

उच्चांकी तांदूळ उत्पादनाबरोबरच पर्यावरण समस्या गांभीर्याने सोडवा !

निसर्गसंवर्धनाचा पंखधारी उत्सव : फुलपाखरांच्या जन्मकथेतून माणसाची जबाबदारी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!