📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 6, 2026
काय चाललयं अवतीभवती

मराठवाडा साहित्य परिषदेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

मराठवाडा साहित्य परिषदेचे २०२५ चे वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर, सचिन कुसनाळे, पांडुरंग पाटील व अनिल अतकरे यांना जाहीर.

छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘२०२५’चे वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर, सचिन कुसनाळे, पांडुरंग पाटील आणि अनिल अतकरे यांना जाहीर झाले आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.

‘नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर ( छत्रपती संभाजीनगर ) यांना ‘अनोखे थायलंड’ या प्रवासवर्णनपर पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. ‘प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार’ सचिन कुसनाळे ( म्हैसाळ ) यांना ‘गांधी वाद आणि वास्तव’ या वैचारिक ग्रंथासाठी जाहीर झाला आहे. ‘बी. रघुनाथ कथा-कादंबरी पुरस्कार’ पांडुरंग मुरारी पाटील ( कपिलेश्वर, ता. राधानगरी ) यांच्या ‘नांगरमुठी’ कादंबरीला जाहीर झाला आहे. रोख तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्कार मागील अर्ध्या शतकापासून ग्रंथवितरण व प्रकाशन क्षेत्रात काम करणारे कैलाश पब्लिकेशन संस्थेचे अनिल अतकरे (छत्रपती संभाजीनगर) यांना जाहीर झाला आहे. दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेने संजीव कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ही ग्रंथनिवड केली असून या समितीत संजीव कुळकर्णी व डॉ विश्वाधार देशमुख, सुहास देशपांडे यांचा समावेश आहे. रा. ज. देशमुख स्मृति पुरस्काराची निवड डॉ. दादा गोरे, डॉ. अनिरुद्ध मोरे आणि डॉ. विष्णू सुरासे यांच्या समितीने केली आहे.

Related posts

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

जे. डी. पराडकर यांच्या ‘ अक्षरयात्रा ‘ पुस्तकाला कोमसापचा पुरस्कार जाहीर

नागपूर श्रीगुरुदेव सेवाश्रमाचे ग्रामजयंती पुरस्काराने विविध संस्था व व्यक्तींचा गौरव

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406