📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 21, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नारळी पौर्णिमेपासून पावसाची शक्यता !

६ ते १५ ऑगस्ट दरम्यान कोकण, विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता. १५ जिल्ह्यांत तापमान ३ ते ४ अंशांनी वाढले असून उष्णतेचा त्रास जाणवतोय.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

शुक्रवार ( दि. ८ ऑगस्ट) , रक्षाबंधन (नारळी पौर्णिमे) पासुन संपूर्ण विदर्भ व कोकणात संपूर्ण दुसरा आठवडा (८ ते १५ ऑगस्ट) ला तर मध्य महाराष्ट्रात दोन दिवस (८ व ९ ऑगस्ट) ला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

मराठवाड्यात मात्र आजपासूनच पुढील ३ दिवस ( ६, ७, ८ ऑगस्ट, बुधवार ते शुक्रवार) ला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता जाणवते.
            विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली,  वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक जाणवते.

तापमानातील वाढ –
                   संपूर्ण विदर्भ, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील पूर्व भाग अश्या १५ जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशानी वाढ होवून तापमान ३२ ते ३३ अंशा दरम्यान जाणवत आहे.

Related posts

शेवगा लागवड मातीच्या आरोग्यासाठी

जास्वंदीच्या फुलझाडासंदर्भात समस्या आहेत, तर मग जाणून घ्या टिप्स..

थेंबाथेंबात आहे जीवन !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406