📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 19, 2026
काय चाललयं अवतीभवती

डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर

Dongari Sahitya award shirala

शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळ व डोंगरी साहित्य परिषदेच्या वतीने २०२० ते २०२२ चे उत्कृष्ठ साहित्य निर्मितीचे डोंगरी साहित्य पुरस्काराची घोषणा शब्दरंग व डोंगरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत पाटील, उपाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी केली.

पद्यविभागात शब्दरंग डोंगरी साहित्य पुरस्कार -प्रतिथयश कवी विजय चोरमारे यांच्या ‘स्तंभसूक्त ‘ या कविता संग्रहाला आणि अहमदनगर येथील प्रसिद्ध कवयित्री माधुरी मरकड यांच्या ‘ ‘रिंगण ‘ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.

तसेच गद्यविभागात उद्योजक बळीराम पाटील चरणकर डोंगरी साहित्य पुरस्कार सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या -‘आठवणीच्या पारंब्या ‘ या ललितलेखसंग्रहाला आणि पंढरपूर येथील साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. वामन जाधव यांच्या ‘ साहित्याची अस्वादक समीक्षा ‘ या समीक्षाग्रंथास जाहीर झाला आहे.

प्रत्येकी दोन हजार पाचशे एक रुपये रोख,सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ असे पुरस्काचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसह २०१९ चेही डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर केलेप्रमाणे पुरस्कार वितरण फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या अकराव्या डोंगरी साहित्य संमेलनात सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत.
दोन वर्ष कोरोना संकट काळात साहित्य संमेलन घेता आले नाही त्यामुळे दोन वर्षातील पुरस्कार वितरण झाले नव्हते.

यावेळी शब्दरंग व डोंगरी साहित्य परिषदेचे सचिव मन्सूर नायकवडी कोषाध्यक्ष सचिन पाटील, कार्यकारिणी सदस्य प्रकाश जाधव, प्रतापराव शिंदे, नथुराम कुंभार, अविनाश जाधव, संपत काळे, श्रीरंग किनरे आदी सदस्य उपस्थित होते.

Related posts

कवी अजय कांडर यांच्या कवितेचा एसएनडीटी विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात समावेश

अर्थसंकल्प 2022-23ः हवामहली व्हिजन डॉक्युमेंटच…

कवी किशोर कदम लिखित बालविश्व काव्यसंग्रहाचे 15 रोजी प्रकाशन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406