📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 5, 2026
काय चाललयं अवतीभवती

शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!

The intensity of the rain will decrease somewhat from Saturday

‘घाटमाथ्यावरील सक्रियेनंतर शेवटी मान्सून घाट उतरला !’
शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!’

१-गेल्या आठवड्यात(१७ ते २४जुलै) दरम्यान घाटमाथ्यावर हजेरी लावून मान्सून घाट उतरत, मराठवाड्यासहित खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अश्या (८+१०)१८ जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

२-मराठवाडा वगळता महाराष्ट्रात आजपासुन शनिवार दि. ३ ऑगस्ट पर्यंतच्या १० दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

३-मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात  मात्र अतिजोरदार पावसाचीही शक्यता अजुनही कायम टिकूनच आहे.

४-परवा शनिवार दि.२७ जुलै पासून मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात पुढील ६ दिवस म्हणजे १ ऑगस्ट पर्यन्त पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता जाणवते.

५-घाटमाथ्यावरील दमदार पावसाने सह्याद्रीच्या कुशीतील तसेच विदर्भातील धरणात जलसंवर्धन होत असुन, जलसाठा वाढीचे सातत्य टिकून आहे. जुलै अखेर ही धरणे १०० टक्क्याच्या आसपास भरण्याची शक्यता जाणवते.  मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणांसाठी मात्र अजुन काही काळ चांगलीच प्रतिक्षा करावी लागेल, असेच वाटते.

माणिकराव खुळे

Related posts

बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या यूट्यूब वाहिन्यांवर कारवाई

अमेरिकेत आहेत अशा सार्वजनिक लायब्ररी…

नवदुर्गाः आधुनिक बहिणाबाई विमल माळी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406