पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता
कोकणाबरोबर आता खान्देश व नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील ७ तालुके वगळता संपूर्ण पश्चिम-अर्ध महाराष्ट्रातील (मुंबईसह कोकण व नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच संपूर्ण मराठ वाडा)अश्या २२ जिल्ह्यात आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार ( दि.४ मे पर्यन्त ) उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते.
मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र उष्णतेच्या लाटेबरोबर घाम काढणाऱ्या दमट वातावरणाचा ही ह्या ५ दिवसात सामना करावा लागेल, असे वाटते.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदाना दरम्यान मात्र (६ व ७ मे ला) कदाचित कमाल व किमान अश्या दोन्हीही तापमानात काहीशी घट होवून सध्याच्या वातावरणापासून काहीसा दिलासाही मिळू शकतो, असे वाटते.
