📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 22, 2026
काय चाललयं अवतीभवती

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

Aksharsagar Sahitya Manch awards announced

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे साहित्य पुरस्कार – 2021ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता. भुदरगड ) येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे अशी माहिती मंचाचे अध्यक्ष राजन कोनवडेकर आणि उपाध्यक्ष डाॅ. अर्जुन कुंभार यांनी दिली आहे.

अक्षरसागर साहित्य मंचातर्फे देण्यात आलेले पुरस्कार असे –

उत्कृष्ट साहित्य पुरस्कार

1) इपळाप (कादंबरी) – नंदू साळोखे
2) सारिपाट (कथासंग्रह) – अंकुश गाजरे
3) दखल बेदखल (काव्यसंग्रह) – शिवाजी सातपुते
4) थांब ना रे ढगोबा (बालकाव्य) – राजेंद्र उगले

विशेष साहित्य पुरस्कार

1) ऊसकोंडी (कादंबरी) – श्रीकांत पाटील
2) नोटबंदी (कथासंग्रह) – दि.बा.पाटील
3) गझलनाद (गझलसंग्रह) – सिराज शिकलगार
4) रानपाखरं (बालकाव्य) – मालती सेमले
5) आठवणींच्या हिंदोळ्यावर – अश्विनी व्हरकट (तालकास्तरीय पुरस्कार)
6) आजीनं सांगीतलेल्या गोष्टी – कु. श्रावणी पाटील (विशेष बालसाहित्यिका पुरस्कार)

14 एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता. भुदरगड ) पहिल्या अक्षरसागर ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आप्पासाहेब खोत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याच हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

यावेळी सुदेश सापळे, अमर देसाई, सचिव बा. स. जठार, खजानिस डी. व्ही. कुंभार, डाॅ. मा. ग. गुरव, प्रा. राणी हुजरे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

Related posts

वडणगेकरांनी करून दाखवलं सुसज्ज क्रीडांगण साकारलं..

सर्वोच्च न्यायालय न्यायाधिश उदय उमेश लळीत

मुंबईत उद्यापासून तर महाराष्ट्रात २३ जून पासून जोरदार पाऊस

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!